शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

आचारसंहितेमुळे शहरातील तब्बल १२५ कोटींची विकासकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:28 IST

मीरा-भाईंदरमधील परिस्थिती : प्राप्त निविदांवर कार्यवाही नाही; अनेक कामे रखडणार

- राजू काळेभाईंदर: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी जाहीर झाला आणि लागलीच देशभरात आचारसंहिता लागू झाली. त्याचा परिणाम मीरा-भाईंदर शहरांतील विविध विकासकामांवर झाला असून यामुळे सुमारे १२५ कोटींची विकासकामे ठप्प होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामांच्या निविदा प्राप्त झाल्यानंतर याच आठवड्यात त्या उघडण्याची कार्यवाही होणार होती. मात्र, आता ही सगळी प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे.मतदारांना प्रभावित करणारी कामे अथवा प्रलोभने दाखवणे हा आचारसंहितेचा भंग ठरतो. असाच प्रकार मीरा-भार्इंदर महापालिकेत घडला आहे. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी कित्येक कोटींच्या विकासकामांच्या निविदा आॅनलाइन प्रसिद्ध केल्या होत्या. याखेरीज, खासदार आणि आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यात एका गृहप्रकल्पासाठी तयार होणाऱ्या सुमारे दीड किमी काँक्रिट रस्त्याचाही समावेश आहे. त्यासाठी तब्बल ६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पालिकेने काही दिवसांपूर्वी त्या रस्त्यासाठी जमीन संपादन तसेच त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली होती. शेवटी, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने त्या रस्त्याच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रियाच खोळंबली आहे. या रस्त्यासह भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन दरम्यानच्या फेज-२ मधील रस्त्याच्या बांधकामासह शहरातील उद्यान विकास आणि दुरुस्ती, पालिकेच्या मालमत्तांची दुरुस्ती, रस्तेदुरुस्ती अशी महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या ७५ विकासकामांच्या आॅनलाइन निविदा पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्या निविदांच्या तांत्रिक कागदपत्रांसह दरपत्रक उघडण्याची कार्यवाही याच आठवड्यात पार पाडण्यात येणार होती. तत्पूर्वीच निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सुमारे १२५ कोटींची विकासकामे ठप्प झाली आहेत. यातील तातडीच्या विकासकामांच्या प्राप्त निविदांना मंजुरी देण्यासाठी प्रशासन राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन भिवंडीत रखडलेभिवंडी : महानगरपालिकेच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन सोमवार, ११ मार्च रोजी करण्याचे ठरले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रविवारपासून आदर्श आचारसंहिता जाहीर केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी काही वर्षांपासून पुढे आली आहे. यानिमित्ताने पालिका महासभेत ठराव घेतला आहे. तरीही, मुख्य इमारतीच्या आवारात पुतळा उभारण्यासाठी कोणतीही कारवाई मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात नव्हती. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.मात्र, तेव्हा आचारसंहिता असेल म्हणून भूमिपूजनासाठी ११ मार्चचा दिवस निवडण्यात आला होता. परंतु, रविवार १० मार्चपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केल्याने त्याचा फटका महानगरपलिकेला बसला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर