शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने २३ बेवारस मृतदेहांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 06:08 IST

लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केलेली ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा बंद पडल्याची बाब शनिवारी पुढे आली.

ठाणे : लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केलेली ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा बंद पडल्याची बाब शनिवारी पुढे आली. यंत्रणा बंद पडल्याने रुग्णालय आणि आजूबाजूच्या असलेल्या नागरी वस्तीत दुर्गंधी पसरू नये, यासाठी बर्फाच्या लाद्या ठेवण्यात येत आहेत. दुसरीकडे तिच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून मृतदेह नेण्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ती पूर्णपणे ठप्प पडल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. तसेच ती तत्काळ सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात १२ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्यामध्ये दोन वातानुकूलित यंत्रणा बसवल्या आहेत. त्यातच दिवसाला पाच ते सहा मृतदेह शवागारात आणले जातात. मध्यंतरी येथील मृतदेहांची संख्या ४० ते ४५ च्या घरात पोहोचली होती. त्याचाच परिणाम येथील वातानुकूलित यंत्रणेवर झाल्याने तेथील एक यंत्रणा पूर्णपणे बंदच पडली होती. तिच्या दुुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु, ते करताना त्या ठेकेदाराचा मृत्यू झाल्याने तसेच दुरुस्तीसाठी लोक आल्यावर शवागारात मृतदेहाची संख्या वाढल्याने त्या यंत्रणेचे काम मागे पडले आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त असो किंवा ठाणे ग्रामीण तसेच पालघर पोलीस अधीक्षक असो, यांना पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून मृतदेह ताब्यात घेतले गेलेले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी रात्री १९ आॅक्टोबरपर्यंत रुग्णालयाच्या शवागारातील मृतदेहांचा आकडा २८ वर गेला होता. या वाढत्या मृतदेहांचा आणि वाढत्या आकड्यांचा परिणाम यंत्रणेवर झाल्याने ती यंत्रणा चार दिवसांपासून बंद पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंद पडलेल्या यंत्रणेमुळे रुग्णालय प्रशासन या दिवसांत बर्फाच्या तीन ते चार लाद्या मागवून तेथे कुलिंग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पाच मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतल्याने सध्या २३ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत.>शवागारातील यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली असून तेथे किडे पडले नाहीत. बेवारस असलेले मृतदेह नेण्याबाबत वारंवार पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहाराद्वारे कळवले आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. तो तसाच राहिल्यास येत्या एक-दोन दिवसांत महापालिकेच्या मदतीने त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतील.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे