शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने २३ बेवारस मृतदेहांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 06:08 IST

लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केलेली ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा बंद पडल्याची बाब शनिवारी पुढे आली.

ठाणे : लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केलेली ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा बंद पडल्याची बाब शनिवारी पुढे आली. यंत्रणा बंद पडल्याने रुग्णालय आणि आजूबाजूच्या असलेल्या नागरी वस्तीत दुर्गंधी पसरू नये, यासाठी बर्फाच्या लाद्या ठेवण्यात येत आहेत. दुसरीकडे तिच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून मृतदेह नेण्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ती पूर्णपणे ठप्प पडल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. तसेच ती तत्काळ सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात १२ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्यामध्ये दोन वातानुकूलित यंत्रणा बसवल्या आहेत. त्यातच दिवसाला पाच ते सहा मृतदेह शवागारात आणले जातात. मध्यंतरी येथील मृतदेहांची संख्या ४० ते ४५ च्या घरात पोहोचली होती. त्याचाच परिणाम येथील वातानुकूलित यंत्रणेवर झाल्याने तेथील एक यंत्रणा पूर्णपणे बंदच पडली होती. तिच्या दुुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु, ते करताना त्या ठेकेदाराचा मृत्यू झाल्याने तसेच दुरुस्तीसाठी लोक आल्यावर शवागारात मृतदेहाची संख्या वाढल्याने त्या यंत्रणेचे काम मागे पडले आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त असो किंवा ठाणे ग्रामीण तसेच पालघर पोलीस अधीक्षक असो, यांना पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून मृतदेह ताब्यात घेतले गेलेले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी रात्री १९ आॅक्टोबरपर्यंत रुग्णालयाच्या शवागारातील मृतदेहांचा आकडा २८ वर गेला होता. या वाढत्या मृतदेहांचा आणि वाढत्या आकड्यांचा परिणाम यंत्रणेवर झाल्याने ती यंत्रणा चार दिवसांपासून बंद पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंद पडलेल्या यंत्रणेमुळे रुग्णालय प्रशासन या दिवसांत बर्फाच्या तीन ते चार लाद्या मागवून तेथे कुलिंग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पाच मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतल्याने सध्या २३ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत.>शवागारातील यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली असून तेथे किडे पडले नाहीत. बेवारस असलेले मृतदेह नेण्याबाबत वारंवार पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहाराद्वारे कळवले आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. तो तसाच राहिल्यास येत्या एक-दोन दिवसांत महापालिकेच्या मदतीने त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतील.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे