शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

व्यसनाधीनतेमुळे इकबालवर कुख्यात डॉन दाऊदची नाराजी, पोलीस चौकशीत अनेक गुपिते उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 21:29 IST

इकबाल कासकर आणि कुख्यात डॉन दाऊद यांच्यात वारंवार बोलणे झाल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले.

ठाणे, दि. 21 : इकबाल कासकर आणि कुख्यात डॉन दाऊद यांच्यात वारंवार बोलणे झाल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे खंडणी प्रकरणात दाऊदच्या सहभागाचीही पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान, ठाण्यातील काही नगरसेवक आणि नेत्यांचाही सहभाग समोर येत असल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्तांनी केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. मात्र, त्यांचे नाव अद्याप समोर आले नसल्याचे आयुक्तांनी त्यांना सांगितले.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी आपले काही वर्षांपूर्वी बोलणे झाले. सध्या आपण त्याच्या संपर्कात नसल्याचा दावा खंडणीप्रकरणी अटकेत असलेला दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने केला आहे. ठाणे-मुंबईतील आणखी कोणाकोणाकडे इकबालच्या अर्थात दाऊदच्या गँगने खंडणीची मागणी केली? ती कशाच्या स्वरूपात आहे? या टोळीमध्ये आणखी किती जण सक्रिय आहेत? यात स्थानिक पातळीवरील आणि दाऊदप्रमाणे परदेशातील आणखी कुणाचा समावेश आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती स्वत: पोलीस आयुक्त परमवीर सिंग, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडून त्याच्यावर करण्यात येत आहे.

परंतु, अनेक प्रश्नांना तो नकारात्मक उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाऊद आणि इकबाल यांच्यात फोनद्वारे वारंवार संवाद झाल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, व्हीओआयपी (व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) द्वारे हा संपर्क झाल्याची शक्यता असल्यामुळे बाहेरील कॉलही स्थानिक असल्याचे आढळून येते. त्यामुळे पुरावे मिळवताना पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या टोळीमध्ये मुंबई, ठाण्यातील अनेक जण सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड होत आहे. इकबाल हा कोकेनपासून अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. याच कारणामुळे दाऊदची आपल्यावर नाराजी आहे. याच नाराजीमुळे दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलणे झाले नसल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. आता त्यात कितपत तथ्य आहे, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.लवकरच चौघांना अटकदाऊद टोळीतील काही गुंडांची माहिती इकबालकडून तपास पथकाला मिळाली आहे. त्यामुळे मुंबई परिसरातून आणखी तीन ते चार जणांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. इकबालसोबत ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एकाचा खंडणी प्रकरणात बºयापैकी सहभाग आढळला आहे. त्याचीही अद्याप चौकशी सुरूच आहे. अन्य दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीसाठी दररोज हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.आव्हाडांनी घेतली आयुक्तांची भेट...इकबाल कासकरला खंडणीप्रकरणी अटक केल्यानंतर या प्रकरणात ठाण्यातील काही नगरसेवक आणि काही नेत्यांचा सहभाग समोर येत असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी जाहीर केले होते. काही वृत्तवाहिन्यांनी ठाण्यातील राष्टÑवादीच्या एका नेत्याचा तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्तीयांचा यात सहभाग असल्याचे वृत्त दिल्याने समाजमाध्यमांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्या वेळी तुमचे यात कुणीही नाव घेतले नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. इकबालच्या अटकेवर पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्यांच्या पथकाचे आव्हाड यांनी अभिनंदन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाऊदने घर बदलले?सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या दाऊदने गेल्या काही वर्षांमध्ये तीन ते चार वेळा आपले राहण्याचे ठिकाण बदलल्याची माहिती इकबालकडून तपास पथकाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात, या वृत्ताला वरिष्ठ अधिकाºयांनी मात्र दुजोरा दिला नाही.