शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

धुकटन जलशुद्धीकेंद्राची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: March 6, 2016 01:41 IST

पेल्हार धरणाची सुरक्षा धोक्यात असल्याची माहिती दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता धुकटन येथील जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी नसल्याने तेथील

शशी करपे,  वसई पेल्हार धरणाची सुरक्षा धोक्यात असल्याची माहिती दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता धुकटन येथील जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी नसल्याने तेथील सुरक्षेची पुरती वाट लागली आहे. धरणांच्या सुरक्षेकडे वसई विरार पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहर अभियंत्यांना घेराव घातला. पेल्हार धरणावर सुरक्षा रक्षक नसल्याने त्याठिकाणी गैरधंद्यांना ऊत आल्याची सचित्र माहिती दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली होती. वसई विरार महापालिकेच्या पेल्हार प्रभाग कार्यालयापासून अवघ्या एक दीड किलोमीटर अंतरावर पेल्हार धरण आहे. मात्र, त्याच्या सुरक्षिततेकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. त्यातच आता पालिकेच्या मुख्यालयापासून शंभर-दीडशे किलोमीटर दूर असलेल्या धुकटन जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा धोक्यात आली असून पालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र त्याचा काहीच थांगपत्ता नसल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. विरार शिवसेना शहरप्रमुख दिलीप पिंंपळे यांनी शिवसैनिकांसह अचानक या केंद्राला भेट दिली. त्यावेळी एकही कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक जागेवर नव्हता. संपूर्ण परिसरात सामान्य माणसाला फिरण्यास आणि फोटो काढण्यास प्रतिबंध आहे. असे असताना शिवसैनिक तास-दोन तास याठिकाणी फिरत होते. त्यांनी फोटोही काढले. पण, कुणीही अटकाव केला नाही. लॅब ओस पडली होती. त्याठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. साफसफाई नसल्याने लॅबमधील सामुग्री धूळ खात पडली आहे. संपूर्ण परिसरात कुणीही बिनधास्त वावरू शकत असल्याचे दिसून येत होते. लॅबमध्ये तंत्रज्ञ नसल्याने शुद्धीकरण झालेल्या पाण्याची तपासणीसुद्धा होत नसल्याने पालिका लाखो लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप पिंंपळे यांनी केला आहे. जलशुद्घीकरण केंद्रातून वाया जाणारे पाणी आजूबाजूच्या शेतात सोडले जात असल्याने यापरिसरातील २२ एकर शेतजमिन धोक्यात आली आहे. तशा शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याची माहिती पिंंपळे यांनी दिली. या प्रसंगी उपतालुका प्रमुख संजय राऊत, शहर संघटक ज्योति पवार, उपतालुका संघटक वैशाली कदम, उपशहर प्रमुख नरेश वैद्य, प्रदीप साने, उदय जाधव, जितेंद्र राऊत, कार्यालय प्रमुख रमाकांत चव्हाण, विभाग प्रमुख विनायक भोसले, दिपक चव्हाण, संजय खाडे, हरिचंद्र पाटील, महिला आघाडी उपशहर संघटक श्रद्धा जाधव, शिला लष्करे रेखा रायकर, पूजा सावंत, जयसिंंग ठाकूर, शैलेश देसाई, मिलिंंद वैद्य, रमेश गुरव, दिनेश मार्गी, केयूर वरवटकर, सुधाकर सतनकर, रोशन जाधव,दिनेश दयाल, संजय कदम इत्यादी व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.