शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

लॉकडाऊनमध्येही औषधपुरवठा सुरूच, क्षय नियंत्रण विभागाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:27 IST

राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे.

ठाणे : देशामध्ये दर तीन मिनिटाला क्षयरु ग्णाचा मृत्यू होतो. क्षयरोगाची लागण झालेला व्यक्ती मानवी बॉम्ब म्हणून ओळखली जाते. यामुळे राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्षयग्रस्त रु ग्णांना उपचारदारम्यान एक विषय कोड देण्यात आल्याने त्यांना शोधून काढणे शक्य झाले आहे.सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात भयाचे वातावरण पसरले. राज्यातही कोरोनाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रु ग्णांवर उपचार करण्यात व्यस्त झालेली दिसते आहे. मात्र, असे असले तरी देशात क्षयरोगानेदेखील थैमान घातलेले आहे. दर तीन मिनिटाला या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे कोरोनाच्या काळातही राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाने अशा रु ग्णांना मोफत औषधे पुरविण्यात खंड पडू दिलेला नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. राज्यातही तो अधिक दक्षतेने पाळला जात आहे. यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, नाकाकामगार, असंघिटत कामगार बेकार झाले आहेत. बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदारांनी वाºयावर सोडल्याने त्यांचे तांडे रस्त्याने गावाकडे जायला निघाले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षयग्रस्त असल्याचे समोर आले आले आहे.।असा घेतला जातोय रुग्णांचा शोधमुंब्रा, भिवंडी, मानखुर्द, गोवंडी आदीसारख्या विभागात क्षयग्रस्त मजुरांची संख्या जास्त आहे. यामुळे राज्याच्या क्षय रोग नियंत्रण विभागाच्या वतीने त्यांना क्षयाची औषधे मोफत दिली जातात. मात्र, यापैकी बरेच मजूर मुंबईच्या बाहेर गेल्याने, तसेच इतर भागात अडकून पडल्याने त्यांना औषधे मिळणार की नाही, हा सवाल रु ग्णांच्या मनात आला आहे. मात्र, अशा रु ग्णांचा ज्या जिल्ह्यात किंवा पालिकेच्या हद्दीत उपचार सुरू आहे.।तेथे त्याचा विशेष कोड नोंद असल्याने त्याला शोधून काढणे शक्य होत आहे. या कोडमध्ये रु ग्णाचे संपूर्ण, नाव, गावाचा व कामाच्या ठिकाणाचा पत्ता, मोबाइल क्र मांक अशी सगळी माहिती नोंद आहे. त्या आधारे राज्याचे क्षय नियंत्रण विभाग क्षयग्रस्त रु ग्णांशी संपर्क करण्यात यशस्वी होत आहे. रु ग्ण ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यात, ज्या राज्यात आहे, तेथील क्षय नियंत्रण विभागाशी संपर्क साधून त्यांना औषधे आणि सकस आहार दिला जात आहे.