शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लॉकडाऊनमध्येही औषधपुरवठा सुरूच, क्षय नियंत्रण विभागाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:27 IST

राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे.

ठाणे : देशामध्ये दर तीन मिनिटाला क्षयरु ग्णाचा मृत्यू होतो. क्षयरोगाची लागण झालेला व्यक्ती मानवी बॉम्ब म्हणून ओळखली जाते. यामुळे राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्षयग्रस्त रु ग्णांना उपचारदारम्यान एक विषय कोड देण्यात आल्याने त्यांना शोधून काढणे शक्य झाले आहे.सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात भयाचे वातावरण पसरले. राज्यातही कोरोनाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रु ग्णांवर उपचार करण्यात व्यस्त झालेली दिसते आहे. मात्र, असे असले तरी देशात क्षयरोगानेदेखील थैमान घातलेले आहे. दर तीन मिनिटाला या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे कोरोनाच्या काळातही राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाने अशा रु ग्णांना मोफत औषधे पुरविण्यात खंड पडू दिलेला नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. राज्यातही तो अधिक दक्षतेने पाळला जात आहे. यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, नाकाकामगार, असंघिटत कामगार बेकार झाले आहेत. बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदारांनी वाºयावर सोडल्याने त्यांचे तांडे रस्त्याने गावाकडे जायला निघाले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षयग्रस्त असल्याचे समोर आले आले आहे.।असा घेतला जातोय रुग्णांचा शोधमुंब्रा, भिवंडी, मानखुर्द, गोवंडी आदीसारख्या विभागात क्षयग्रस्त मजुरांची संख्या जास्त आहे. यामुळे राज्याच्या क्षय रोग नियंत्रण विभागाच्या वतीने त्यांना क्षयाची औषधे मोफत दिली जातात. मात्र, यापैकी बरेच मजूर मुंबईच्या बाहेर गेल्याने, तसेच इतर भागात अडकून पडल्याने त्यांना औषधे मिळणार की नाही, हा सवाल रु ग्णांच्या मनात आला आहे. मात्र, अशा रु ग्णांचा ज्या जिल्ह्यात किंवा पालिकेच्या हद्दीत उपचार सुरू आहे.।तेथे त्याचा विशेष कोड नोंद असल्याने त्याला शोधून काढणे शक्य होत आहे. या कोडमध्ये रु ग्णाचे संपूर्ण, नाव, गावाचा व कामाच्या ठिकाणाचा पत्ता, मोबाइल क्र मांक अशी सगळी माहिती नोंद आहे. त्या आधारे राज्याचे क्षय नियंत्रण विभाग क्षयग्रस्त रु ग्णांशी संपर्क करण्यात यशस्वी होत आहे. रु ग्ण ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यात, ज्या राज्यात आहे, तेथील क्षय नियंत्रण विभागाशी संपर्क साधून त्यांना औषधे आणि सकस आहार दिला जात आहे.