शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लॉकडाऊनमध्येही औषधपुरवठा सुरूच, क्षय नियंत्रण विभागाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:27 IST

राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे.

ठाणे : देशामध्ये दर तीन मिनिटाला क्षयरु ग्णाचा मृत्यू होतो. क्षयरोगाची लागण झालेला व्यक्ती मानवी बॉम्ब म्हणून ओळखली जाते. यामुळे राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाकडून या क्षयग्रस्त रु ग्णांवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक औषधे पोहचविण्याचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्षयग्रस्त रु ग्णांना उपचारदारम्यान एक विषय कोड देण्यात आल्याने त्यांना शोधून काढणे शक्य झाले आहे.सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात भयाचे वातावरण पसरले. राज्यातही कोरोनाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रु ग्णांवर उपचार करण्यात व्यस्त झालेली दिसते आहे. मात्र, असे असले तरी देशात क्षयरोगानेदेखील थैमान घातलेले आहे. दर तीन मिनिटाला या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे कोरोनाच्या काळातही राज्याच्या क्षय नियंत्रण विभागाने अशा रु ग्णांना मोफत औषधे पुरविण्यात खंड पडू दिलेला नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. राज्यातही तो अधिक दक्षतेने पाळला जात आहे. यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, नाकाकामगार, असंघिटत कामगार बेकार झाले आहेत. बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदारांनी वाºयावर सोडल्याने त्यांचे तांडे रस्त्याने गावाकडे जायला निघाले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षयग्रस्त असल्याचे समोर आले आले आहे.।असा घेतला जातोय रुग्णांचा शोधमुंब्रा, भिवंडी, मानखुर्द, गोवंडी आदीसारख्या विभागात क्षयग्रस्त मजुरांची संख्या जास्त आहे. यामुळे राज्याच्या क्षय रोग नियंत्रण विभागाच्या वतीने त्यांना क्षयाची औषधे मोफत दिली जातात. मात्र, यापैकी बरेच मजूर मुंबईच्या बाहेर गेल्याने, तसेच इतर भागात अडकून पडल्याने त्यांना औषधे मिळणार की नाही, हा सवाल रु ग्णांच्या मनात आला आहे. मात्र, अशा रु ग्णांचा ज्या जिल्ह्यात किंवा पालिकेच्या हद्दीत उपचार सुरू आहे.।तेथे त्याचा विशेष कोड नोंद असल्याने त्याला शोधून काढणे शक्य होत आहे. या कोडमध्ये रु ग्णाचे संपूर्ण, नाव, गावाचा व कामाच्या ठिकाणाचा पत्ता, मोबाइल क्र मांक अशी सगळी माहिती नोंद आहे. त्या आधारे राज्याचे क्षय नियंत्रण विभाग क्षयग्रस्त रु ग्णांशी संपर्क करण्यात यशस्वी होत आहे. रु ग्ण ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यात, ज्या राज्यात आहे, तेथील क्षय नियंत्रण विभागाशी संपर्क साधून त्यांना औषधे आणि सकस आहार दिला जात आहे.