शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मादक पदार्थ सेवनाने युवापिढी व समाजाबरोबरच देशाचेही नुकसान - समीर वानखेडे

By नितीन पंडित | Updated: September 2, 2023 18:28 IST

मादक पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन फक्त युवा पिढीचे, समाजाचे नुकसान होत नाही तर देशाचेही फार मोठे नुकसान होत आहे, असे मत आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडले.

भिवंडी : मादक पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन फक्त युवा पिढीचे, समाजाचे नुकसान होत नाही तर देशाचेही फार मोठे नुकसान होत आहे, कारण या मादक पदार्थाच्या व्यवसायातील अनिर्बंध पैसा हा देशविघातक कारवाया करण्यासाठी अतिरेकी संस्थांच्या हातून वापरला जातो आणि त्यासाठी मादक पदार्थांच्या व्यसनापासून युवा वर्गाने दूर राहण्याची गरज आहे असे मत आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडले. शानिवारी ते भिवंडी येथील इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.याठिकाणी मुंबई येथील आत्मसन्मान मंच या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यां साठी " महिलांना सन्मानाने काम करण्याचा अधिकार,समस्या व आव्हाने " या विषयावर मार्गदर्शन सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष श्याम बाबुराव चौघुले,आत्मसन्मान मंच संस्थेचे नित्यानंद शर्मा,प्राचार्या डॉ.गायत्री पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संघर्ष हा प्रेरणास्रोत ठेवून मार्गक्रमण केले तर अपयश कधीच कोणाला येणार नाही, म्हणून मी सदैव काम करताना सत्याची लढाई लढत असल्याने मला कोणाचे भय बाळगण्याची गरज नाही.विचारमंच या सामाजिक चळवळीच्या व्यासपीठावरून आपण नशा मुक्ती, रक्तदान,अवयव दान, केंद्रीय व राज्य स्तरीय प्रशासकीय सेवेसाठी युवकांना प्रशिक्षण हे ध्येय ठेवून कार्य करीत असल्याचे समीर वानखेडे यांनी शेवटी सांगितले.या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सुध्दा समीर वानखेडे यांनी दिली.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शाहरुख खान यांच्या जवान या चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भात समीर वानखेडे यांनी ट्विट केलेले विधान चर्चेत असल्याने त्या संदर्भात समीर वानखेडे यांना विचारले असता कोणता चित्रपट? कोण हिरो? मी कोणाला ओळखत नाही असे सांगत ज्यांचा आदर्श भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना कोणत्या हिरोची गरज नाही अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीSameer Wankhedeसमीर वानखेडे