शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डोंबिवलीतील २७ गावांमध्ये टंचाई : आदेशानंतरही पाणीप्रश्न कायम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 06:49 IST

केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही.

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. दोन महिन्यांत पाणीप्रश्न न सुटल्यास पुढील निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा नांदिवलीमधील ‘सर्वाेदय पार्क’ इमारतीमधील १८९ कुटुंबीयांनी घेतला आहे.१ जून २००५ ला २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाली. तेव्हापासून पाणीप्रश्न सतावत आहे. ग्रामपंचायत असताना जेवढा पाणीपुरवठा होत होता, तेवढाही आता होत नाही. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने महिन्याला त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत.पाणी मिळत नसताना महापालिकेकडून ४० ते ५० हजारांची पाणीबिले पाठवून जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील पाणीप्रश्नावर मंत्रालयदरबारी वारंवार बैठका झाल्या आहेत.नांदिवली परिसरातील रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता. तसेच महापौर आणि अन्य पदाधिकाºयांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यानंतरही समस्या कायम राहिल्याने रहिवाशांनी याप्रकरणी डिसेंबरमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्रही पाठवले होते. पत्रात समस्येची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, या पत्राकडे दुर्लक्ष झाले आहे.जलपुनर्भरणाचा नागरिकांना दिलासाच्पाण्याचा कोटा वाढवण्याची केली जाणारी मागणी ही कार्यवाहीअभावी कागदावरच राहिली आहे. परिणामी, पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यामुळे नांदिवली येथील समर्थनगरमधील ‘सर्वाेदय पार्क’मधील रहिवासी पाणीटंचाईने पुरते हैराण झाले आहेत.च्संकुलातील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे काही अंशी दिलासा मिळाला असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाWaterपाणी