शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

डोंबिवलीतील २७ गावांमध्ये टंचाई : आदेशानंतरही पाणीप्रश्न कायम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 06:49 IST

केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही.

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. दोन महिन्यांत पाणीप्रश्न न सुटल्यास पुढील निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा नांदिवलीमधील ‘सर्वाेदय पार्क’ इमारतीमधील १८९ कुटुंबीयांनी घेतला आहे.१ जून २००५ ला २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाली. तेव्हापासून पाणीप्रश्न सतावत आहे. ग्रामपंचायत असताना जेवढा पाणीपुरवठा होत होता, तेवढाही आता होत नाही. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने महिन्याला त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत.पाणी मिळत नसताना महापालिकेकडून ४० ते ५० हजारांची पाणीबिले पाठवून जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील पाणीप्रश्नावर मंत्रालयदरबारी वारंवार बैठका झाल्या आहेत.नांदिवली परिसरातील रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता. तसेच महापौर आणि अन्य पदाधिकाºयांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यानंतरही समस्या कायम राहिल्याने रहिवाशांनी याप्रकरणी डिसेंबरमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्रही पाठवले होते. पत्रात समस्येची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, या पत्राकडे दुर्लक्ष झाले आहे.जलपुनर्भरणाचा नागरिकांना दिलासाच्पाण्याचा कोटा वाढवण्याची केली जाणारी मागणी ही कार्यवाहीअभावी कागदावरच राहिली आहे. परिणामी, पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यामुळे नांदिवली येथील समर्थनगरमधील ‘सर्वाेदय पार्क’मधील रहिवासी पाणीटंचाईने पुरते हैराण झाले आहेत.च्संकुलातील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे काही अंशी दिलासा मिळाला असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाWaterपाणी