शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

डॉ. क्षितिज कुलकर्णी यांना नाट्य श्री' पुरस्कार प्रदान

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 12, 2022 16:44 IST

पु.ल.देशपांडे सर्वोत्तम विनोदी अभिनेता पुरस्काराचे मानकरी गौरव संभुस

ठाणे : अजेय संस्था आयोजित झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ विद्यालंकार सभागृहात पार पडला. यावेळी डॉ.क्षितिज कुलकर्णी यांना ‘नाट्य श्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला तर यंदाच्या पु.ल.देशपांडे सर्वोत्तम विनोदी अभिनेता पुरस्काराचे मानकरी गौरव संभुस ठरले. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. 

यावेळी इतर विभागांतून देखील पुरस्कार देण्यात आले. राजस वैद्य, केशवकुमार, क्षमा वाखारकर. उमा रावते यांना गुरुवर्य केशवराव मोरे स्मृती सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार, हर्षल चव्हाण, कार्तिक हजारे, आकाश जाधव यांना डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार, अपर्णा संत, सुमित चोडणेकर, तुषार मोहिते, आकाश जाधव यांना झपूर्झा मैत्र पुरस्कार, पवन वेलकर, हेमांगी कुळकर्णी संभुस, अवधूत यरगोळे यांना झपूर्झारत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सावरकर म्हणाले की, कलाकार आणि विदूषक ह्यातला फरक समजून घेत शिस्तीने वाटचाल करणे महत्त्वाचे असते. कारण नट हा कलाकार असतो. पैसे मिळत जातात म्हणून काहीही काम करू नये, मनाला पटेल तेच करावे असा कानमंत्र त्यांनी दिला.

दरम्यान, बसून बोलेल तो नट कसला ' ह्या वाक्याने उभे राहून मनोगताला सुरूवात करताना उभे राहून बोलले की मनातील प्रामाणिक भावना नेमक्या यावेळी शब्दझपूर्झा या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मनोरंजना बरोबरच विचार ही शब्दझपूर्झा अंकातून आपल्या समोर येत आहेत असे प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी सोळांकूरकर यांनी सांगितले. 'मनोरंजन कधी युती कधी कट्टी' या विषयावर सोळांकूरकर यांनी संवाद साधला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन डॉ.क्षितिज कुलकर्णी यांनी केले आहे. जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी झपूर्झा मध्ये जिव्हाळा असल्याचे सांगत कवितेचे सादरीकरण केले. व्यास क्रीएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी शब्दझपुर्झाबद्दल आपले मनोगत मांडले.

दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ज्येष्ठ अभिनेते सावरकर, ज्येष्ठ कवी म्हात्रे, कवी सोळांकुरकर, प्रकाशक गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या सई लेले, अभिनेत्री सुनीता फडके, लेखिका मेघना साने, कवी विजय जोशी, कवी रामदास खरे, कवी विकास भावे आदींच्या उपस्थितीत पुरस्कारवितरण सोहळा पार पडला. झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव १६ सप्टेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे दुपारी ४.३० पासून सुरू होत असल्याची माहिती यावेळी दिली. निवडक मोफत प्रवेशिकासाठी ९९३०१७५५२७, ८९२८८६४१७१, ९८६७९८५२०९, ७२०८६८८२३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.