शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा डीपीआर चार महिन्यात - कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:49 IST

आठ ते नऊ महिन्यात कामाला होणार सुरूवात

बदलापूर : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) चार महिन्यांत तयार करण्यात येईल. तर आठ ते नऊ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरु वात होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईत खासदारांची बैठक झाली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आर. एस. खुराना, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न खासदार कपिल पाटील यांनी मांडले. त्याचबरोबर कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा प्रकल्प अहवाल प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले होते.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडून प्राधान्याने घेण्यात आले. त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. येत्या चार महिन्यांत अहवाल आल्यानंतर, त्याचा अभ्यास करून आठ ते नऊ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. त्यात भूसंपादनाच्या कामाचाही समावेश असेल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पनवेल-दिवा-भिवंडी रोड-वसई रोड रेल्वेमार्गावर फेºयांची संख्या वाढवावी, कल्याण-कसारा दरम्यान तिसºया व चौथ्या मार्गाच्या कामाला गती द्यावी, वासिंद येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला वेग द्यावा, आसनगाव रेल्वेस्थानकात कसाºयाच्या दिशेकडील पूल तयार करावा, खडवली ते वालकस-बेहरे दरम्यान नव्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अधिकाºयांबरोबर विशेष बैठक घ्यावी, आटगाव-तानशेत मार्गावरील कळमगाव येथे नवा भुयारी मार्ग वा रूंदीकरण करावे, टिटवाळा-खडवली दरम्यान गुरवली स्थानक, बदलापूर-वांगणी दरम्यान चामटोली स्थानकाला मंजुरी द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आटगावपर्यंत लोकलसंख्या वाढवावी, लोकलमध्ये दरवाजे अडविणाºया प्रवाशांविरोधात मोहीम राबवावी, चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम वेगाने करावे, भावनगर-काकीनाडा एक्स्प्रेसला भिवंडीत थांबा द्यावा, लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा द्यावा, डेक्कन क्वीन व इंटरिसटी एक्स्प्रेसला कल्याणमध्ये थांबा द्यावा आदी मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत वातानुकूलित लोकल सुरू करावी, अशी आग्रही मागणी खासदार पाटील यांनी केली. बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्र मांक दोनवर रेल्वे शेडचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे रोज शेकडो प्रवाशांची गैरसोय होत असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. त्यावेळी अपूर्ण रेल्वे शेडचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले.मुरबाड रेल्वेचे काम वेगाने होणारकल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याचे जाहीर केले आहे. येत्या चार महिन्यांत अंतिम प्रकल्प अहवाल आल्यानंतर, नऊ महिन्यांत कामाला सुरु वात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी आशा खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वे