शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

कष्टकरी महिलांना लोकलची दारे बंदच, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:16 IST

Mumbai Local News : नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र  लोकलची दारे  बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.

मीरारोड -  नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र  लोकलची दारे  बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.भाईंदरपासून थेट वसई-विरारपुढे सफाळे ते थेट पालघर-डहाणूपर्यंतच्या भागात भाजीपाला, फळे, फळांची  बागा्यती आहेत. तसेच मासेमारीचा व्यवसायही मोठा आहे. ग्रामीण भागातून स्थानिक महिला भाजीपाला विक्रीसाठी मुंबई,  उपनगरात लोकलने  प्रवास करतात. मीरा-भाईंदर, वसई-विरारमध्येही भाजीपाला, मासे, फळविक्रीसाठी रोज सफाळे-पालघर- डहाणूवरून महिला यायच्या. या व्यवसायावरच  त्यांच्या कुटुंबीयांचा उदरवनिर्वाह वर्षांनुवर्षे करत आहेत. परंतु, मार्चअखेरीस  कोरोनामुळे लोकल बंद करण्यात आल्या. शिवाय, बाजार-मंडईही बंद केल्या. तेव्हापासून महिलांचा व्यवसाय बंद  असून उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.काही महिलांनी पोटाची खळगी भरायची म्हणून खाजगी टेम्पोवाल्यांना  भाडे ठरवून जमेल तसा व्यवसाय सुरू ठेवण्याची धडपड चालवली. परंतु, टोपली भरून भाजीविक्रीला जाणाऱ्या महिलांना  टेम्पोचं लांबचं भाडं परवडणार नसल्याने लोकल सुरू होण्याची  प्रतीक्षा करत होत्या. नवरात्रीपासन महिलांनालोकलप्रवासाची राज्य सरकारने खुली  केल्याने आपल्याला व्यवसायाचा पुनश्य हरिओम होईल, अशी आशा कष्टकरी महिलांना होती. लोकलसेवा महिलांसाठी सुरू झाली, मात्र  कष्टकरी महिलांना प्रवासास मनाई केली जात आहे. त्यामुळे  रेल्वेने आम्हालाप्रवासाची परवनगी दिली पाहिजे, अशी मागणी  या महिनांनी केली आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक