शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची चिंता नको! मोडकसागर धरण पूर्ण भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:52 IST

जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.

ठाणे : जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर पाहायला मिळाला. काही ठिकाणी पावसाची रिपरिप होती. जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण मंगळवारी रात्री ९.२४ वाजता पूर्ण क्षमतेने भरले धरणाखालील ४२ गावांना आधीच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.मोडक सागर धरणातून दररोज मुंबईला सुमारे ४४० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात पावसाचा जोर कमी-अधिक असून, धरण क्षेत्रात मात्र तो वाढलेला आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण, आंध्रा, मोडकसागर आदी गेल्या वर्षी १०० टक्के भरलेले होते.यंदा धरण क्षेत्रात पावसाला विलंब झाला आहे. आता बारवीत ७५.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. याप्रमाणेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८६.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी धरणातमंगळवारी ६२ मिमी पाऊस पडला.>तानसा-वैतरणातही८९ टक्के पाणीसाठाबारवी धरणाची पाणीपातळी आता ६९.६० मीटर झाली आहे. धरणात अजून तीन मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. भातसात मंगळवारी ८५.५६ टक्के पाणीसाठा झाला असून धरणात ८८ मिमी पाऊस पडला. तर आंध्र धरणात २९ मिमी पाऊस पडल्याने ५६ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ६९ मिमी पाऊस पडला. आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तानसात ९५ मिमी पाऊस पडला असून ८९ टक्के साठा तयार झाला आहे. मध्यवैतरणा धरणात ३९ मिमी पाऊस पडला असता या धरणात आतापर्यंत ८९.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.