शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पाण्याची चिंता नको! मोडकसागर धरण पूर्ण भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:52 IST

जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.

ठाणे : जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर पाहायला मिळाला. काही ठिकाणी पावसाची रिपरिप होती. जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण मंगळवारी रात्री ९.२४ वाजता पूर्ण क्षमतेने भरले धरणाखालील ४२ गावांना आधीच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.मोडक सागर धरणातून दररोज मुंबईला सुमारे ४४० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात पावसाचा जोर कमी-अधिक असून, धरण क्षेत्रात मात्र तो वाढलेला आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण, आंध्रा, मोडकसागर आदी गेल्या वर्षी १०० टक्के भरलेले होते.यंदा धरण क्षेत्रात पावसाला विलंब झाला आहे. आता बारवीत ७५.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. याप्रमाणेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८६.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी धरणातमंगळवारी ६२ मिमी पाऊस पडला.>तानसा-वैतरणातही८९ टक्के पाणीसाठाबारवी धरणाची पाणीपातळी आता ६९.६० मीटर झाली आहे. धरणात अजून तीन मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. भातसात मंगळवारी ८५.५६ टक्के पाणीसाठा झाला असून धरणात ८८ मिमी पाऊस पडला. तर आंध्र धरणात २९ मिमी पाऊस पडल्याने ५६ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ६९ मिमी पाऊस पडला. आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तानसात ९५ मिमी पाऊस पडला असून ८९ टक्के साठा तयार झाला आहे. मध्यवैतरणा धरणात ३९ मिमी पाऊस पडला असता या धरणात आतापर्यंत ८९.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.