शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

ठाणेकरांना करवाढ लादू नका; राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना साकडे

By अजित मांडके | Updated: February 21, 2024 14:18 IST

सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत.

ठाणे :  सध्या सबंध देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे . अशा स्थितीत ठाणे महानगर पालिकेकडून आगामी अर्थसंकल्पात करवाढ केल्यास महागाईने पिचलेल्या ठाणेकरांचे कंबरडेच मोडेल. त्यामुळे अर्थसंकल्पात करवाढ करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार या पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे , हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार,उपाध्यक्ष संजीव दत्त्ता,रोहिदास पाटील,राजेश साटम,संदीप यादव,फिरोज पठाण,संदीप पवार  यांच्या शिष्टमंडळाने आज ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे. ठाणेकर नागरिकही या महागाईच्या फेऱ्यातून सुटलेले नाहीत. कोरोनानंतर अनेकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. उत्पन्नाला मर्यादा आलेल्या असताना महागाई मात्र अमर्याद वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नव्याने करवाढ झाली तर सामान्य ठाणेकरांचे कंबरडे मोडले जाणार आहे.  लवकरच ठाणे महानगर पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तथा अर्थसंकल्प मांडले जाणार आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक गणित बिघडलेले असले तरी  आजमितीला करवाढ केल्यास  ते ठाणेकरांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात मालमत्ता, पाणी आदी करांमध्ये तसेच टीएमटीच्या तिकिट दरांमध्ये वाढ करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सुहास देसाई यांनी, ठाणेकरांना अधिकची आर्थिक झळ सोसावी लागू नये, यासाठी आयुक्तांना करवाढ न करण्याची विनंती केली आहे. आयुक्तांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे, असे सांगितले.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन