शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

ठाणेकरांना करवाढ लादू नका; राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना साकडे

By अजित मांडके | Updated: February 21, 2024 14:18 IST

सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत.

ठाणे :  सध्या सबंध देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे . अशा स्थितीत ठाणे महानगर पालिकेकडून आगामी अर्थसंकल्पात करवाढ केल्यास महागाईने पिचलेल्या ठाणेकरांचे कंबरडेच मोडेल. त्यामुळे अर्थसंकल्पात करवाढ करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार या पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे , हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार,उपाध्यक्ष संजीव दत्त्ता,रोहिदास पाटील,राजेश साटम,संदीप यादव,फिरोज पठाण,संदीप पवार  यांच्या शिष्टमंडळाने आज ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे. ठाणेकर नागरिकही या महागाईच्या फेऱ्यातून सुटलेले नाहीत. कोरोनानंतर अनेकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. उत्पन्नाला मर्यादा आलेल्या असताना महागाई मात्र अमर्याद वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नव्याने करवाढ झाली तर सामान्य ठाणेकरांचे कंबरडे मोडले जाणार आहे.  लवकरच ठाणे महानगर पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तथा अर्थसंकल्प मांडले जाणार आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक गणित बिघडलेले असले तरी  आजमितीला करवाढ केल्यास  ते ठाणेकरांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात मालमत्ता, पाणी आदी करांमध्ये तसेच टीएमटीच्या तिकिट दरांमध्ये वाढ करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सुहास देसाई यांनी, ठाणेकरांना अधिकची आर्थिक झळ सोसावी लागू नये, यासाठी आयुक्तांना करवाढ न करण्याची विनंती केली आहे. आयुक्तांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे, असे सांगितले.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन