शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

डोंबिवलीतील खूनाच्या गुन्हयातील फरारी आरोपीला १२ वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 19:25 IST

मध्य प्रदेशातील चंबळ या अत्यंत संवेदनशील परिक्षेत्रातून ठाणे पोलिसांनी खूनाच्या गुन्हयात पसार असलेल्या राजकुमार राजावत याला अटक केली. २ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यायालयाने त्याच्यासह चौघा आरोपींविरुद्ध कलम ८७ प्रमाणे जाहीरनामाही काढला होता.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईचंबळ खोऱ्यात १५ दिवस सापळा लावून घेतले ताब्यातपोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते आदेश

ठाणे: डोंबिवलीतील शैलेंद्रसिंह शेखावत (२७, रा. जयपूर, राजस्थान) याचा खून करुन १२ वर्षांपूर्वी पसार झालेल्या राजकुमार राजावत (६२, रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्यप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट एकच्या पथकाने १५ एप्रिल रोजी अटक केली. मध्यप्रदेश विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) मदतीने चंबळ या अत्यंत संवेदनशील परिक्षेत्रातून ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.शैलेंद्रसिंह काही पैशांच्या मोबदल्यामध्ये सुशिक्षित तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे काम करीत होता. डोंबिवलीतील नरेंद्रसिंग राजावत (मुुळ रा. मेहंदवा, जि. भिंड, मध्यप्रदेश) आणि पिंटूसिंग राजावत (मुुळ रा. मध्यप्रदेश)यांच्याकडूनही त्याने परदेशात नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले होते. परंतू, त्यांना त्याने नोकरीही लावली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही. याच कारणावरुन नरेंद्रसिंग, पिंटूसिंग, राजकुमार आणि रिषी डॅग यांनी आपसात संगनमत करुन शैलेंद्रसिंह याचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह शालीमध्ये गुंडाळून तो नाल्यामध्ये फेकून पलायन केले होते. त्यानंतर याप्रकरणी खून करुन पुरावा नष्ट केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध २१ मार्च २००७ रोजी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या खूनानंतर सर्व आरोपी पसार झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कलम २९९ नुसार १३ मे २००८ रोजी पुराव्यानिशी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. आरोपींचा शोध घेऊनही ते पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे २ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यायालयाने त्यांच्यांविरुद्ध कलम ८७ प्रमाणे जाहीरनामा काढला होता. त्याच अनुषंगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यातील फरारी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खबऱ्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने या तपासाला सुरुवात केली. फरार आरोपी राजकुमार हा मध्यप्रदेशातील भिंड जिल्हयातील महेंदवा या त्याच्या मुळगावी असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार आनंदा भिलारे, सुनिल जाधव, शिवाजी गायकवाड आणि सुभाष मोरे आदींच्या पथकाने मध्यप्रदेशातील चंबळ या गुन्हेगारीसाठी कुख्यात असलेल्या खोºयात प्रत्यक्ष १५ दिवस मुक्काम करुन सापळा लावला. स्थानिक भिंड जिल्हयातील असवाल पोलिसांसह एसटीएफचीही यावेळी मदत घेण्यात आली. अखेर राजावत याला १५ एप्रिल रोजी या पथकाने ताब्यात घेतले. हवालदार आनंदा भिलारे यांची कामगिरी मोलाची ठरल्याचेही देवराज यांनी सांगितले. राजावत याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या इतरही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून