शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा, डोंबिवली उड्डाणपुलाबाबत पालकांना धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 00:37 IST

पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक असल्याचे रेल्वेने घोषित केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला नाही.

- जान्हवी मोर्येडोंबिवली  - पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक असल्याचे रेल्वेने घोषित केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला नाही. मात्र या पुलावर वाहतूककोंडी होऊ न त्यात स्कूलबसची रखडपट्टी होत आहे. त्यामुळे पालकांना भीती वाटत असून या बसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.ओमकार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या पुलावरून स्कूलबसची वाहतूक करू नये. तसेच, अवजड वाहनांना बंदी घालून धोकादायक पूल असल्याचे फलक लावावेत, यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आहे. चव्हाण यांनी या पुलाची फाइल फेरतपासणीसाठी गेली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे त्यांना सांगितले.स्कूलबसमध्ये किमान ५५ विद्यार्थी असतात. तसेच पुलाखालून रेल्वे लाइन गेली असून केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे, तर नागरिकांचाही जीव धोक्यात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल पालकांनी केला आहे. तसेच यंत्रणांनी पूल धोकादायक असल्याचा फलक लावल्यास शाळेला वाहतूक वळवण्याची सूचना करता येईल. अन्यथा ही मागणी कोणत्या आधारावर केली आहे, असे शाळेकडून विचारणा होऊ शकते.शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या पालक अपर्णा सावंत यांनी सांगितले की, हा पूल बंद करण्यात येणार होता. मात्र, प्रत्यक्षात हा पूल सुरू आहे.धोकादायक असल्यामुळे या पुलावरून अवजड वाहने नेण्यात येऊ नयेत. आमचा शाळेत गेलेला मुलगा घरी सुखरूप येईपर्यंत धाकधूक लागलेली असते. आम्ही आमच्या शाळेला वाहतूक वळविण्याची मागणी करू, पण इतर मुलांचे काय? कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज असल्याने आम्ही ही मागणी केली आहे. प्रशासनाने पुलाची डागडुजी तरी करावी. कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट आम्हाला पाहायची नाही.फुले रोड परिसरात राहणाºया पालक तृप्ती जगताप म्हणाल्या की, या पुलावरून लहान वाहनांची वाहतूक सुरू ठेवावी. मात्र, अवजड वाहने आणि शालेय बस यांची वाहतूक ठाकुर्ली पुलावर वळविण्यात यावी. पश्चिम परिसरात अनेक बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. एवढी या पुलाची क्षमता उरली आहे का, हेही पाहावे. वर्षा थळकर म्हणाल्या की, आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. फुले रोडवरून जाणाºया बसला ठाकुर्ली पूल सोयीस्कर ठरतो. मात्र, स्टेशन परिसरातील मुलांना घेऊन बस या पुलावरून जाण्याची तसदी घेणार नाहीत. त्यामुळेच सर्वच बसची वाहतूक वळवावी.उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी संजय ससाणे म्हणाले की, कोपर पुलासंदर्भातील निर्णय हे रेल्वे प्रशासन, आरटीओ आणि केडीएमसी या यंत्रणा एकत्रित घेतात. १२ टनांपेक्षा कमी वजन असलेल्या वाहनांना या पुलावर बंदी नाही. शालेय वाहने ही १२ टनांपेक्षा कमी आहेत की नाही हे सांगता येणार नाही. काही जुन्या बसचे वजन हे १२ टनांपेक्षा जास्त आहे. यासंदर्भात माहिती मागितली किंवा अभिप्राय मागतल्यास ती आम्ही देऊ.पालकांनी केला सुरक्षा उपायओमकार इंटरनॅशनल स्कूलमधील पश्चिम विभागात राहणाºया पालकांनी एक व्हॉट्सअ‍ॅप गु्रप बनवला आहे. त्यांनी पुलावरून शालेय वाहतूक करण्यासमनाई केली आहे. या पालकांनी आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करून किंवा रिक्षाने मुलांना स्टेशनपर्यंत घेऊन येण्याचा आणि तिथून पुढे जीना उतरून पाल्याला बसमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून पश्चिमेतील विद्यार्थ्यांनी पूर्वेत बस पकडण्याससुरुवात केली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली