शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

डोंबिवली: बिल्वदलचे रहिवासी न्यायाच्या प्रतिक्षेत, पालकमंत्र्यांनी दिली केवळ आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 18:22 IST

मानपाडा रोडवरील बिल्वदल ही इमारत ८ ऑगस्ट २०१४ रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील ४८ कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते.

डोंबिवली: येथिल मानपाडा रोडवरील बिल्वदल ही इमारत ८ ऑगस्ट २०१४ रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील ४८ कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे रहिवाश्यांनी इमारत तातडीने रिकामी केली. पण त्यास आज ३ वर्षे ८ महिने झाले, पुढे इमारतीच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने कसलीही हालचाल झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी सुनिलनगरमधील ओमशिव गणेश या इमारतीला तडे गेल्याने त्यांनीही इमारत रीकामी केली, पण त्यांना आयुक्त गोविंद बोडके हे तातडीने प्लॅन मंजूर करुन देणार आहेत तर मग आमच्यावर अन्याय का असा सवाल रहिवाश्यांनी केला.येथिल रहिवासी शिवसेनेचे कार्यकर्ते संजय मांजरेकर म्हणाले की, यासंदर्भात अनेकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले असून मुख्यमंत्र्यांना १२० वेळा पत्रव्यवहार केला, पण हाती मात्र काहीही आले नाही. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांनाही पत्र दिले, पण स्थिती जैसे थे. १९८३ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. त्यामुळे इमारत जुनी झाली असून रिकामी करावी लागणार असे सोनवणे यांनी आदेश दिले, ते आम्ही तातडीने पाळले होते, पण ते एकल्यामुळेच रस्त्यावर येण्याची वेळ आली का असा सवाल मांजरेकर यांनी केला. पालकंत्र्यांना ९ जानेवारी रोजी देखिल भेटलो, पण बघू करु अशीच आश्वासने मिळाली, पुढे हालचाल मात्र काहीही झाली नाही. खासदात श्रीकांत शिंदेंनीही १७ जानेवारी रोजी आमची मंत्रालयात बैठक लावली होती. त्यावेळीही पालकमंत्री, महापौर, महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी, नगरसेवक सगळे उपस्थित होते, पण ती केवळ बैठकच ठरल्याचे ते म्हणाले.आतापर्यंत सहा आयुक्त आले, पण आमची ओंजळ रिकामीच राहीली. आता नवे आयुक्त बोडके हे वेगवान कार्यशील अधिकारी असल्याचे जाणवत आहे. ज्या प्रमाणे त्यांनी मंगळवारी डोंबिवलीत येत ‘त्या’ रहिवाश्यांना दिलासा दिला, तसाच न्याय आम्हालाही द्यावा अशी रहीवाश्यांच्या वतीने मागणी करत असल्याचे मांजरेकर म्हणाले. आयुक्त दर महिन्याच्या तिस-या सोमवारी डोंबिवलीत येणार असल्याचे कळले होते, ते जेव्हा डोंबिवलीत येतील तेव्हा त्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले. त्या रहिवाश्यांना न्याय मिळायलाच पाहिजे, पण आम्हालाही आमच्या जागा मिळाव्यात ही अपेक्षा असून आश्वासनांच्या हिंदोळयावर किती दिवस जगायचे असा सवाल मांजरेकर यांनी केला.