शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

डोंबिवली : आधी रिक्षा स्टँड द्या मगच नव्या रिक्षा रस्त्यावर आणा, रिक्षा चालक-मालक युनियनचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 19:05 IST

शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात

डोंबिवली: शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात. आधी त्या विभागाच्या अधिका-यांनी डोंबिवलीत यावे, वस्तूस्थितीचा अभ्यास करावा, स्टँडची सोय करावी आणि त्यानंतरच नवे इरादापत्र द्यावे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका पश्चिमेकडील रिक्षा चालक मालक युनियनने घेतली आहे.युनियनचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या शहरामध्ये आरटीओ अधिकारी कधी बघितलेही नाहीत. त्यांना येथे बसण्यासाठी आम्ही सर्व युनियन एकत्र आलो होतो, ट्रॅफिक गार्डनमध्ये आरटीओ अधिका-यांना ठाण मांडावे असे आवाहन केले होते, त्याचे पुढे काय झाले हे माहित नाही. असे एक ना अनेक प्रस्ताव आमच्यासह अन्य युनयिनने दिले होते, पण ती सर्व पत्र वेळोवेळी बासनात गुंडाळली गेली का? असा सवालही त्यांनी केला.आता जो मागेल त्याला इरादा पत्र या तत्वावर परमिट देण्यात येत आहेत, द्यायला हरकत नाही, पण शहराची वाहन क्षमता संपलेली आहे. त्याचे काय? स्थानक परिसरात सकाळ संध्याकाळ सोडाच कधीही कोंडीच असते. नागरिकांसह रिक्षा चालकांनाही या कोंडीतून मार्ग कसा काढावा हा प्रश्न आहे. असे असतांना आणखी वाहने कशाला आणायची? आणायची असली तरी नव्यांसह जुन्या वाहनांसाठी सुसज्ज रिक्षा स्टँड हवा. रिक्षा चालकांना स्वच्छतागृह, आरामाची जागा हवी. या मुलभूत सुविधा कोण देणार? कल्याण-डोंबिवली महापालिका त्याकडे कानाडोळा करते, वाहतूक विभाग हात वर करतो, मग इराद्यासाठी हजारो रुपये, रिक्षेसाठी लाखो रुपये खर्चून हाती काय पडणार असा सवाल म्हात्रे यांनी केला. जे इरादापत्र घेत आहेत त्या नागरिकांनीही भविष्यातील अडथळयांचा विचार करावा, आधी सुविधा मिळवाव्यात आणि वाहने घ्यावीत. अन्यथा मोठा पेच निर्माण होणार असून त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेतील असेही ते म्हणाले.त्यासंदर्भात गुरुवारी संध्याकाळी रिक्षा चालक-मालकांची महत्वाची बैठक पश्चिमेला मच्छीमार्केटलगत होणार आहे. नव्या इरादापत्रांना विरोध नसून आरटीओ अधिका-यांच्या दुटप्पी भूमिकेसाठी ठोस पावले घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्या बैठकीतील ठराव, नीवेदन कल्याण,ठाणे आरटीओ आणि परिवहन मंत्र्यांना देणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.* या आधीही जून महिन्यात भाजपाप्रणित रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर यांनी इरादापत्रांसंदर्भात तीव्र आक्षेप घेतले होते. कल्याणच्या रिक्षा युनयिनचे पदाधिकारी नाना पेणकर यांनीही आक्षेप घेत पत्र दिली आहेत. त्याची सखोल चौकशी व्हावी. तसेच सातत्याने रिक्षा युनियन यासंदर्भात आवाज उठवत असूनही त्याकडे कानाडोळा का केला जात आहे असा सवाल रिक्षा चालक मालक युनियनच्या पदाधिका-यांनी केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली