शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली : आधी रिक्षा स्टँड द्या मगच नव्या रिक्षा रस्त्यावर आणा, रिक्षा चालक-मालक युनियनचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 19:05 IST

शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात

डोंबिवली: शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात. आधी त्या विभागाच्या अधिका-यांनी डोंबिवलीत यावे, वस्तूस्थितीचा अभ्यास करावा, स्टँडची सोय करावी आणि त्यानंतरच नवे इरादापत्र द्यावे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका पश्चिमेकडील रिक्षा चालक मालक युनियनने घेतली आहे.युनियनचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या शहरामध्ये आरटीओ अधिकारी कधी बघितलेही नाहीत. त्यांना येथे बसण्यासाठी आम्ही सर्व युनियन एकत्र आलो होतो, ट्रॅफिक गार्डनमध्ये आरटीओ अधिका-यांना ठाण मांडावे असे आवाहन केले होते, त्याचे पुढे काय झाले हे माहित नाही. असे एक ना अनेक प्रस्ताव आमच्यासह अन्य युनयिनने दिले होते, पण ती सर्व पत्र वेळोवेळी बासनात गुंडाळली गेली का? असा सवालही त्यांनी केला.आता जो मागेल त्याला इरादा पत्र या तत्वावर परमिट देण्यात येत आहेत, द्यायला हरकत नाही, पण शहराची वाहन क्षमता संपलेली आहे. त्याचे काय? स्थानक परिसरात सकाळ संध्याकाळ सोडाच कधीही कोंडीच असते. नागरिकांसह रिक्षा चालकांनाही या कोंडीतून मार्ग कसा काढावा हा प्रश्न आहे. असे असतांना आणखी वाहने कशाला आणायची? आणायची असली तरी नव्यांसह जुन्या वाहनांसाठी सुसज्ज रिक्षा स्टँड हवा. रिक्षा चालकांना स्वच्छतागृह, आरामाची जागा हवी. या मुलभूत सुविधा कोण देणार? कल्याण-डोंबिवली महापालिका त्याकडे कानाडोळा करते, वाहतूक विभाग हात वर करतो, मग इराद्यासाठी हजारो रुपये, रिक्षेसाठी लाखो रुपये खर्चून हाती काय पडणार असा सवाल म्हात्रे यांनी केला. जे इरादापत्र घेत आहेत त्या नागरिकांनीही भविष्यातील अडथळयांचा विचार करावा, आधी सुविधा मिळवाव्यात आणि वाहने घ्यावीत. अन्यथा मोठा पेच निर्माण होणार असून त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेतील असेही ते म्हणाले.त्यासंदर्भात गुरुवारी संध्याकाळी रिक्षा चालक-मालकांची महत्वाची बैठक पश्चिमेला मच्छीमार्केटलगत होणार आहे. नव्या इरादापत्रांना विरोध नसून आरटीओ अधिका-यांच्या दुटप्पी भूमिकेसाठी ठोस पावले घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्या बैठकीतील ठराव, नीवेदन कल्याण,ठाणे आरटीओ आणि परिवहन मंत्र्यांना देणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.* या आधीही जून महिन्यात भाजपाप्रणित रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर यांनी इरादापत्रांसंदर्भात तीव्र आक्षेप घेतले होते. कल्याणच्या रिक्षा युनयिनचे पदाधिकारी नाना पेणकर यांनीही आक्षेप घेत पत्र दिली आहेत. त्याची सखोल चौकशी व्हावी. तसेच सातत्याने रिक्षा युनियन यासंदर्भात आवाज उठवत असूनही त्याकडे कानाडोळा का केला जात आहे असा सवाल रिक्षा चालक मालक युनियनच्या पदाधिका-यांनी केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली