शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जलद डोंबिवली लोकल कल्याणलाच फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:23 IST

डोंबिवली : डोंबिवली स्थानकातून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी जलद लोकल रात्रीच्या वेळी कल्याण येथील कारशेडनजीक फलाट क्रमांक-७ ...

डोंबिवली : डोंबिवली स्थानकातून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी जलद लोकल रात्रीच्या वेळी कल्याण येथील कारशेडनजीक फलाट क्रमांक-७ पुढील मोकळ्या जागेमध्ये थांबते. तेथूनच पहाटे ती लोकल सुटते. लोकल सुटण्याअगोदर कल्याणमधील असंख्य प्रवासी त्या लोकलमध्ये चढतात, त्यामुळे जेव्हा ती लोकल डोंबिवली स्थानकात फलाट क्र.-५ वर येते, त्यावेळी डोंबिवलीतील प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे ती केवळ नावाला डोंबिवली-सीएसएमटी जलद लोकल असून त्याचा डोंबिवलीकरांना काहीही फायदा नसल्याने ही लोकल डोंबिवली स्थानकातूनच सोडावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे.डोंबिवलीतील प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या केल्या आहेत. डोंबिवलीतील प्रवाशांचे म्हणणे असे की, लोकल रात्रीच्या वेळी ठाकुर्ली यार्डात आणावी. सकाळी तेथून ती सोडण्यात यावी, जेणेकरून डोंबिवलीकरांना त्यामध्ये बसण्यास जागा मिळेल. पण तसे न होता अनेकदा लोकल कल्याण येथूनच भरून येत असल्याने प्रवाशांचे नाहक वाद होतात. ठाकुर्ली, दिवा या स्थानकांमध्ये लोकल उभी केल्यास ती सकाळच्या वेळी डोंबिवलीतील जलद लोकलच्या फलाटावर आणण्यात अडथळे येत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.सकाळच्या वेळी एवढा वेळ प्रशासनाकडे नाही, त्यामुळे आदल्या दिवशी रात्री कल्याण येथे ही लोकल आल्यानंतर ती सायडिंगला उभी करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कल्याणमधून निघाली की, थेट डोंबिवलीला येते, परंतु त्या लोकलमध्ये आधीच प्रवासी बसून येत असल्याने डोंबिवलीकरांना त्या कथित डोंबिवली लोकलचा काहीच फायदा होत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.अनेकदा ही लोकल सकाळी वेळेवर येत नाही, त्यामुळे फलाट क्रमांक ५ वर गर्दी वाढत जाते. लोकल विलंबाने आल्याने अगोदर कल्याणहून खच्चून भरून आलेल्या लोकलमध्ये प्रवेश करताना डोंबिवलीतील प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे ही डोंबिवली जदल लोकल असून नसल्यासारखी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.तोपर्यंत समस्या कशी सुटणार?डोंबिवली रेल्वेस्थानकातून ही लोकल फलाट क्र.-२ वरून फलाट क्र.-५ वर येण्यात तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे फलाट क्र. ५/६ वा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर थेट डोंबिवली स्थानकातून लोकल सोडणे शक्य होईल का, असा प्रवाशांचा सवाल आहे. तोपर्यंत जलद लोकलच्या फेºया वाढणार नसल्याने समस्या सुटणार कशी, असा डोंबिवलीकर प्रवाशांपुढील पेच आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे