शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

जलद डोंबिवली लोकल कल्याणलाच फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:23 IST

डोंबिवली : डोंबिवली स्थानकातून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी जलद लोकल रात्रीच्या वेळी कल्याण येथील कारशेडनजीक फलाट क्रमांक-७ ...

डोंबिवली : डोंबिवली स्थानकातून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी जलद लोकल रात्रीच्या वेळी कल्याण येथील कारशेडनजीक फलाट क्रमांक-७ पुढील मोकळ्या जागेमध्ये थांबते. तेथूनच पहाटे ती लोकल सुटते. लोकल सुटण्याअगोदर कल्याणमधील असंख्य प्रवासी त्या लोकलमध्ये चढतात, त्यामुळे जेव्हा ती लोकल डोंबिवली स्थानकात फलाट क्र.-५ वर येते, त्यावेळी डोंबिवलीतील प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे ती केवळ नावाला डोंबिवली-सीएसएमटी जलद लोकल असून त्याचा डोंबिवलीकरांना काहीही फायदा नसल्याने ही लोकल डोंबिवली स्थानकातूनच सोडावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे.डोंबिवलीतील प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या केल्या आहेत. डोंबिवलीतील प्रवाशांचे म्हणणे असे की, लोकल रात्रीच्या वेळी ठाकुर्ली यार्डात आणावी. सकाळी तेथून ती सोडण्यात यावी, जेणेकरून डोंबिवलीकरांना त्यामध्ये बसण्यास जागा मिळेल. पण तसे न होता अनेकदा लोकल कल्याण येथूनच भरून येत असल्याने प्रवाशांचे नाहक वाद होतात. ठाकुर्ली, दिवा या स्थानकांमध्ये लोकल उभी केल्यास ती सकाळच्या वेळी डोंबिवलीतील जलद लोकलच्या फलाटावर आणण्यात अडथळे येत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.सकाळच्या वेळी एवढा वेळ प्रशासनाकडे नाही, त्यामुळे आदल्या दिवशी रात्री कल्याण येथे ही लोकल आल्यानंतर ती सायडिंगला उभी करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कल्याणमधून निघाली की, थेट डोंबिवलीला येते, परंतु त्या लोकलमध्ये आधीच प्रवासी बसून येत असल्याने डोंबिवलीकरांना त्या कथित डोंबिवली लोकलचा काहीच फायदा होत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.अनेकदा ही लोकल सकाळी वेळेवर येत नाही, त्यामुळे फलाट क्रमांक ५ वर गर्दी वाढत जाते. लोकल विलंबाने आल्याने अगोदर कल्याणहून खच्चून भरून आलेल्या लोकलमध्ये प्रवेश करताना डोंबिवलीतील प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे ही डोंबिवली जदल लोकल असून नसल्यासारखी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.तोपर्यंत समस्या कशी सुटणार?डोंबिवली रेल्वेस्थानकातून ही लोकल फलाट क्र.-२ वरून फलाट क्र.-५ वर येण्यात तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे फलाट क्र. ५/६ वा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर थेट डोंबिवली स्थानकातून लोकल सोडणे शक्य होईल का, असा प्रवाशांचा सवाल आहे. तोपर्यंत जलद लोकलच्या फेºया वाढणार नसल्याने समस्या सुटणार कशी, असा डोंबिवलीकर प्रवाशांपुढील पेच आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे