शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

डोंबिवली : आरटीओच्या नियमानुसार रिक्षा स्टँडवर दरपत्रक लावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:36 IST

रिक्षा चालकांनी 2014 पासून शेअरच्या भाड्यामध्ये विशेष दरवाढ केलेली नाही. आरटीओच्या नियमांनुसार जे भाडे आकारायला हवे होते ते आता आकारण्याचा मानस असल्याने तेव्हाच्या नियमांनुसारचे दरपत्रक आता सर्वत्र रिक्षा स्टँडवर आम्ही लावणार असल्याचा पवित्रा लाल बावटा रिक्षा युनियनने घेतला आहे.

डोंबिवली -  रिक्षा चालकांनी 2014 पासून शेअरच्या भाड्यामध्ये विशेष दरवाढ केलेली नाही. आरटीओच्या नियमांनुसार जे भाडे आकारायला हवे होते ते आता आकारण्याचा मानस असल्याने तेव्हाच्या नियमांनुसारचे दरपत्रक आता सर्वत्र रिक्षा स्टँडवर आम्ही लावणार असल्याचा पवित्रा लाल बावटा रिक्षा युनियनने घेतला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरटीओने शब्द न पाळल्याने युनियनने ही भूमिका स्पष्ट केली.

त्या संघटनेचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात त्यांची आरटीओ अधिकारी, प्रवासी संघटना आणि वाहतूक नियंत्रण अधिका-यांसमवेत डोंबिवलीत बैठक झाली होती. त्यावेळी आरटीओ अधिका-यांनी कोणत्याही संघटनेने परस्पर फलक लाऊ नयेत, असे आवाहन केले होते. तसेच आगामी दोन दिवसात आरटीओ नियमांनुसार जे भाडे आकारायला हवे ते फलक लावेल, असेही स्पष्ट केले होते. पण त्या बैठकीला आता पाच दिवस होऊन गेले.

तरीही आरटीओकडून कोणताही पुढाकार घेतल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे आरटीओ अधिका-यांची या विषयासंदर्भात मानसिकता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता लाल बावटा रिक्षा युनयिनच्या माध्यमातून सर्वत्र फलक लावण्यात येतील. त्यामधून नागरिकांना वास्तवता कळेल आणि आता जे भाडे आकारले जात आहे.  प्रत्यक्ष नियमांनुसार जे आकारायचे आहे त्यामध्ये असलेली तफावत स्पष्ट होईल. त्यामुळे एकप्रकारे जनजागृतीच होणार असून कोठेही वादविवाद होणार नाहीत. फलकांवरून तातडीने सर्व वस्तूस्थिती समोर निदर्शनास येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरटीओ अधिका-यांची चुप्पी का आहे? हे मात्र कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

लाल बावटा परस्पर फलक लावण्याच्या पावित्र्यात असल्याबद्दल आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाdombivaliडोंबिवली