शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Dombivali: डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या १९७४ च्या दहावीच्या बँचची तब्बल ५० वर्षांनी भेट

By अनिकेत घमंडी | Updated: February 9, 2024 11:02 IST

Dombivali News: मनामधे खूप सारी उत्सुकता , कुतूहल ,  १६-१७ वर्षाच्या वयात  ज्यांचा व्यथित अंत:करणानी निरोप घेतला होता ; त्यांना भेटण्याची ओढ अश्या अनिवार भावना घेऊन आम्ही सगळे , जवळपास ५० जण २९-३० जानेवारीला पुण्याजवळच्या पामवुड्स रिसॉर्ट वर भेटलो .

- अनिकेत घमंडी डोंबिवली - मनामधे खूप सारी उत्सुकता , कुतूहल ,  १६-१७ वर्षाच्या वयात  ज्यांचा व्यथित अंत:करणानी निरोप घेतला होता ; त्यांना भेटण्याची ओढ अश्या अनिवार भावना घेऊन आम्ही सगळे , जवळपास ५० जण २९-३० जानेवारीला पुण्याजवळच्या पामवुड्स रिसॉर्ट वर भेटलो . वेगवेगळ्या गावांवरुन कुणी बस करुन कुणी स्वत:च्या गाड्यांनी कुणी , ओला , उबर , ट्रेन वगैरेनी तिथे पोचलो . निमित्त होतं दहावीच्या बॅचला ५० वर्ष पूर्ण झाल्याचं. त्यासाठी डोंबिवलीच्या   ‘ टिळकनगर विद्यामंदिर  ‘ शाळेचे १९७४ च्या बॅचचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने , मोठ्या संख्येने जमले होते.

तेथे पोचल्यावर आनंदाचा सुखद अनुभव आला . सगळ्यांचं स्वागत औक्षण करुन , फुलं गजरे देऊन करण्यात आलं . प्रत्येकाच्या मनगटावर घालून सगळ्यांचे मैत्रीचे बंध घट्ट करण्यात आले . तिळगुळ देऊन तोंड व हा प्रसंग गोड करण्यात आला . मग एकच गडबड उडाली . सगळ्यांना सगळ्यांशी भेटायची घाई होऊन गेली . कोण कुठे असतात , काय करतात ?  मुलंबाळं कुटुंबाची चौकशी सुरू झाली.  ५० वर्षाचं साठलेलं कुतुहल शमवून आपल्या जुन्याच मित्रमैत्रिणींशी नव्याने ओळख झाली. कुणी पटकन ओळखू आले तर कुणाला ओळख द्यावी लागली. ह्या भेटीगाठीच्या सुखद सोहळ्यात सगळ्यांची तहानभूक हरपली होती , पण जेवणाच्या खमंग वासाने पावलं तिकडे वळली व  काळजीपूर्वक ठरवलेल्या वैविध्यपूर्ण , अतिशय चविष्ट जेवणाचा आस्वाद मित्रमैत्रीणींच्या साथीनी अजूनच रुचकर झाला . 

मित्रमैत्रिणींच्या साथीबरोबरच साथ होती निसर्गाची . अतिशय नयनरम्य अशा या रिसाॅर्टमधे जेवणाची व्यवस्था नदीच्या किनारी केली होती . झुळझुळ वाहणारी नदी , पलिकडच्या तीरावरची हिरवाई , दाट झाडी ..अलिकडे सुबक रितीनी मांडलेले टेबल्स आणि स्वादिष्ट जेवण . पोट आणि मन तुडुंब भरुन गेले . सगळा रिसॉर्टच खूप सुंदर आहे . दुतर्फा नारळाच्या झाडांची रांग असलेले आखीव रेखीव रस्ते , नीट राखलेले लाॅन्स , फुलझाडं , टुमदार  कौलारू , सर्व सोयींनी सुसज्ज असे बैठे बंगले आणि नदीच्या बाजूने जाणारा सुंदर कठड्यानी नदीपासून विभागलेला , दाट झाडांनी वेढलेला रस्ता  . आणि उरलेल्या जागेत पसरलेली हिरवीगार शेतं . अतिशय छान ठिकाण . तसंच बैलगाडी , घोड्याची सवारी , नेमबाजी , सायकलिंग वगैरे आकर्षणं होतीच . सगळ्यांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला  आणि मग संध्याकाळच्या आल्हाददायक हवेत , सुखद गारव्यात सुरू झाला मित्रमैत्रिणींच्या विविध कलादर्शनाचा कार्यक्रम . शाळेत गॅदरिंगमधे चमकलेले लोक तर होतेच पण काही छुपे रुस्तम पण होते . गाणी , नकला ,  काव्यवाचन , मनोगतं , मजेशीर उखाणे , विडंबनं , डान्स यांनी अगदी बहार उडवून दिली . रात्री बारा , साडेबारा वाजेपर्यंत उत्तरोत्तर रंगतच गेला कार्यक्रम . 

दिवस संपला पण मन भरलं नव्हतं . दुसऱ्या दिवशीचे वेध लागले होते . तो इथल्या वास्तव्याचा शेवटचा दिवस . तो जास्तीत जास्त कारणी लावायची प्रत्येकाची इच्छा होती . मग गप्पागोष्टींमधे चहा नाश्ता , घोळक्या घोळक्यानी रिसाॅर्टचा फेरफटका , हास्यविनोदात मजेत वेळ घालवून मंडळी परतली आणि सुरू झाला मजेदार गेम्सचा सिलसिला . हसत खेळत , गंमतीशीर खोडकर मिश्किल काॅमेंट्स करत धमाल आली . आणि आतापर्यंत आनंदात , मजेत घालवलेला वेळ संपत आला . एका ओढीनी मित्रमैत्रीणी एकमेकांना भेटले होते  . एकमेकांबरोबर प्रेमाने , आनंदाने वेळ घालवला होता . आजी आजोबा झालेले सगळे परत शाळेच्या वयात जाऊन दंगामस्तीत रमून गेले होते . इतक्या वर्षांचं अंतर पुसून एकमेकांमधे मिसळून गेले होते .

पण जेवणा नंतर निरोपाची वेळ आलीच . ती वेळ कठीण असते पण पुन्हा लवकरच भेटण्याची , एकत्र जमण्याची आश्वासनं देऊन आणि तोपर्यंत पुरेल इतकी आनंदाची , प्रेमाची , समाधानाची शिदोरी घेऊन , एक उर्जा घेऊन प्रत्येक जण घरी परतला . फोटोंमधे त्यांनी एकमेकांना आणि आठवणींना साठवून ठेवलं होतंच .

ही सगळी ट्रीप आनंदात , सुरळीत पार पडावी म्हणून आमच्यातलेच आठजण आठदहा महिन्यांपासूनच कामाला लागले होते . तारीख , ठिकाण ठरवण्यापासून लोकांची येण्याजाण्याची व्यवस्था , जेवण नाश्त्याचे मेनू  , रहाण्याची सोय , कार्यक्रमाची रूपरेषा , गेम्सचं नियोजन वगैरे वगैरे पर्यंत अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करुन केलेल्या त्यांच्या चोख आयोजनामुळे हे गेटटुगेदर , सगळ्यांचं वास्तव्य आनंददायी झालं व सगळे समाधानाने , पुढच्या भेटीची उत्कंठा घेऊन घरी परतले . या संमेलनाच्या आठवणी दिर्घकाळ मनात रेंगाळत रहातील अशा भावना कोणाचेही नाव टाकू नका असे सांगून ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी हसतमुखाने घरी परतले.

टॅग्स :Educationशिक्षणdombivaliडोंबिवली