शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छता अभियानाकडे बघताना ते साध्य करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांची दशा सरकारला दिसत नाही का?- जगदीश खैरालिया  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:58 IST

सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचे पुढचे पुष्प जगदीश खैरालिया यांनी गुंफले. गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छता अभियानाकडे बघताना ते साध्य करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांची दशा सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देमहात्मा गांधींचे विचार आणि आजचे स्वच्छता अभियान’ या विषयावर खैरालिया यांचे मत आजही समाजाच्या मनातून अस्पृश्यता जात नाही - जगदीश खैरालियाडॉ. संजय मंगला गोपाळ अध्यक्षस्थानी

ठाणे : ‘गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि न्याय या मूल्यांबरोबरच समाजाला बौद्धिक श्रम आणि शारिरीक श्रम यांचा सारखाच सन्मान करण्याची शिकवण दिली. पण आज गांधीजींच्या नावाने आणि त्यांच्या चष्म्याचे चिन्ह वापरुन वाजत गाजत सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात फक्त दिखाऊ स्वच्छतेला महत्व दिलं जातंय,या अभियानाच्या प्रचारासाठीच्या जाहिरातींवर लाखो करोडो रुपये खर्च केले जातायत पण ही स्वच्छता करण्यासाठी ज्या सफाई कामगारांचा घाम गळतोय त्यांच्या सोयी सुविधेसाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी काहीही विचार केला जात नाही. संविधानातील तरतुदींमुळे कायद्याने गेली असली तरी आजही समाजाच्या मनातून अस्पृश्यता जात नाही हे आजचे विदारक सत्य आहे,” असे ठाण्यातील सफाई कामगारांच्या वस्तीत वाढत, त्यांची दुर्दशा अनुभवत मोठे झालेले आणि त्यांच्यासाठी तळमळीने कार्य करणारे  जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी गांधी स्मृतिदिनाचे औचित्य साधत ‘सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत’ ‘महात्मा गांधींचे विचार आणि आजचे स्वच्छता अभियान’ या विषयावर बोलताना म्हटले. 

ते पुढे म्हणाले, ”आज सर्वच ठिकाणी कंत्राटी सफाई कामगारांची संख्या कायम सफाई कामगारांपेक्षा जास्त आहे. आता तर १००% सफाई कामगार कंत्राटावर ठेवण्याचा विचार सरकार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले आहेत की कंत्राटवर काम करणार्‍या सफाई कामगारांनाही कायम स्वरूपी कामगारांप्रमाणे किमान वेतन, युनिफॉर्म, रजा, ग्राचुइटी आणि इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरीही आजतागायत कोणतेही सरकार ही गोष्ट अमलात आणत नाही. या उपर आता तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या खर्चात कशी कपात करता येईल याचे जीआर निघत आहे आणि वरच्या श्रेणीतील अधिकार्‍यांच्या वेतनात सतत वाढ होते आहे. अशा प्रकारे आर्थिक विषमता आणि त्याचा परिणाम म्हणून सामाजिक विषमता वाढवण्याचे काम आज सरकारे करीत आहेत. या विरूद्ध सभागृहामध्ये आवाज उठवणारे आज कोणीच राहिले नाहीत. तसेच गांधींजीचा साधेपणाचा आग्रहही आजच्या झगमगाटात विरून गेला आहे.”या वेळी समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ अध्यक्षस्थानी होते.ठाण्यातील मान्यवर नागरिक शुभानन आजगावकर, मृणाल बोरकर, विवेक बोरकर, नरेश भगवाने,बिरपाल भाल, स्नेहल काळे, मनीषा जोशी, लतिका सु.मो., हर्षलता कदम, अजय भोसले शैलेश राठोड,विक्रांत कांबळे, संतोष चव्हाण या वेळी उपस्थित होते.‘समता विचार प्रसारक संस्थेतर्फे’ ‘सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत’ चहुबाजुने पसरलेल्या ठाण्यातील विविध वस्त्यांमध्ये नागरिकांना अनेक विषयातील तज्ञ मान्यवरांची व्याख्याने त्यांच्याच विभागात आयोजित केली जातात जेणेकरून त्यांना त्यांच्या घराजवळ चांगले विचार ऐकण्याची संधी मिळावी. आज या मालिकेची सांगता सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ डॉ. शुभा थत्ते यांच्या ‘तरुणांचे प्रश्न आणि सद्यस्थिती’ या विषयावरील व्याख्यानाने सावरकर नगर येथील महापालिका शाळा क्रं.१२० येथे संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. यावेळी वंचितांच्या रंगमंचावर गाजलेली ‘कॉम्प्लिकेटेड’ ही नाटिका सादर होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMaharashtraमहाराष्ट्र