शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

रेल्वे अपघाताचे राजकारण करू नका; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 11:07 IST

ओडिशातील रेल्वे अपघाताचे राजकारण न करता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या दाैऱ्यावर असलेल्या अनुराग ठाकूर यांनी नऊ वर्षांतील केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची जंत्री वाचून दाखवली. २०२४ मध्ये माेदीच पुन्हा पंतप्रधान हाेतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.  तसेच ओडिशातील रेल्वे अपघाताचे राजकारण न करता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

टाऊन हॉलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुद्रा लोन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, घरगुती गॅस, नळजोडणी, शौचालय, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन, देशाच्या विकासाचा आलेख, संरक्षण साहित्यात स्वयंसिद्धता आदींचा आढावा घेतला. यावेळी ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचे विरोधकांनी राजकारण न करता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मोदी यांचा झंझावात देशच नव्हे तर जग ओळखून आहे. त्यामुळे २०२४ ला पुन्हा मोदी सरकारच बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे ते म्हणाले.

ठाकूर यांनी गेल्या दाैऱ्यात शहरातील रस्ते, पाणीटंचाई, स्वच्छता आदी समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच पुढील दौऱ्यात याबाबत आढावा घेणार असल्याचा दम अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, यावर त्यांनी रविवारी मौन बाळगले. मैदानाच्या प्रश्नावरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या पत्रकार परिषदेला आमदार संजय केळकर, कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी, गुलाब करनजुळे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरAnurag Thakurअनुराग ठाकुर