शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

लघु उद्योजकांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आजपासूनच सुरु - सुरेश प्रभु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:45 IST

मराठी उद्योजकांसाठी आजपासूनच दिवाळी सुरु झाली असून, त्यांनी मोदींनी केलेल्या घोषणेचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.

ठळक मुद्देमराठी उद्योजकांना संधीमराठी उद्योजकांची अडथळ्यांची शर्यत दूर

ठाणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या काही घोषणा केल्या आहेत. त्या लघु उद्योजकांसाठी दिवाळी पूर्वीच पहिली पहाट झालेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत मराठी उद्योजकांनी गरुड झेप घ्यावी असे आवाहन केंद्रीय वाणिज्य, उद्योग तथा नागरी उड्डयण मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.        ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या कार्यक्रमाल ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी उद्योजकांना आवाहन केले. मराठी उद्योजक झेप घेऊन पुढे येत नाहीत, ते नेहमीच थोडे घाबरलेले असतात. परंतु आता मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर मराठी उद्योजकांनी यामध्ये मोठी गरुड झेप घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. मराठी माणसाची दिवाळी ही पहिली अंघोळ जेव्हा असते, त्यावेळी खºया अर्थाने दिवाळी सुरु झाली असे मानले जाते. परंतु आता मराठी उद्योजकांची दिवाळीची पहिली पहाट ही आजपासूनच झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केवळ घोषणा केल्या जात होत्या. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने उद्योजकांचा हिरमोड होत होता. आता मात्र केवळ घोषणाच झाली नसून त्याची अंमलबजावणीसुध्दा आजपासून सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. देशाला अडथळा शर्यतीत कधीही गोल्ड मेडल मिळालेले नाही. परंतु लघु उद्योग क्षेत्रातल्या काम करणाºया मंडळींना रोजच्या रोज अडथळ्यांच्या शर्यतीला सामोरे जावे लागते. परंतु ही अडथळ्यांची शर्यत पार करुन लघु उद्योजक यशस्वी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. जर हे अडथळेच नसतील तर लघु उद्योजक किती पुढे जातील, ती संधी आता केंद्र सरकाराने उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योग सुरु करतांना कर्ज मिळत नाही, कर्ज मिळाले तर व्याज परवडत नाही, व्याज परवडले तर बाजारपेठ मिळत नाही, बाजारपेठ मिळाली तर पैसे परत मिळण्यासाठी धडपड सुरु असते. परंतु आता ज्या घोषणा झाल्या आहेत, त्यामुळे या सर्व अडचणी दुर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मला दिल्लीला थांबण्यासाठी सांगितले होते. परंतु मी ठाण्याची निवड केली. ठाण्यात आल्यावर प्रवास पूर्ण होतो असे बोलले जाते. त्यानुसार ठाण्यात आल्यावर आता आमचे देखील उद्दीष्ट खºया अर्थाने पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या समवेत भिवंडीचे खासदार कपील पाटील, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक महेश महाबळेश्वरकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेSuresh Prabhuसुरेश प्रभूBJPभाजपा