शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील पाडकाम कारवाई १० दिवसांसाठी लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:59 IST

मुदत मागितल्याने प्रशासनाने घेतला काढता पाय

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील कांदळवणावर मागील तीन वर्षांपासून उभ्या राहिलेल्या चाळी आणि इमारतींवर कारवाईसाठी मंगळवारी गेलेल्या जिल्हा प्रशासनाला कारवाई न करताच खाली हात परतवावे लागले. कारवाईच्या ठिकाणी जवळपास ४ ते ५ हजारांपेक्षा अधिक नागरिक जमा झाल्याने काही काळ या ठिकाणचे वातावरण गंभीर झाले होते. न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा आणि न्यायालयातही जर विरोधात निर्णय लागला तर संसार हलवण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती शेकडो रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाला केली. त्यानुसार त्यांना १० दिवसांची मुदत दिल्याची माहिती ठाणे तहसीलदारांनी दिली.

दिव्यात खारफुटींची कत्तल करून त्यावर तीन वर्षांत उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी येथील बांधकामांवर कारवाई करण्यासाठीप्रशासनाचे पथक पोलीस बंदोबस्तात गेले होते. दिव्यातील साबे गावात ही १००० हून अधिकची बांधकामे असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार होती. मात्र, कारवाईच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने प्रशासनाला कारवाई करता आली नाही.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील सर्व्हे क्र मांक २३६, ७९, ८० आणि ७५ यावर कांदळवने नष्ट करून त्यावर बांधकामे उभारल्याचा दावा करून जिल्हाधिकारी कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला. यापूर्वी अशाच प्रकारे ठाणे महापालिकेने या भागातील काही बांधकामांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी प्रशासनाने या संदर्भात पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आदिक पाटील यांनी दिवा परिसरात बॅनरवर जाहीर नोटीस लावून येथील रहिवाशांना ९ डिसेंबरपर्यंत घरे रिकामी करण्याचे सांगितले होते. तसे न केल्यास बळजबरी घरे रिकामी करण्यात येतील व तो खर्च घरमालकांकडून वसूल करण्यात येईल, अशी तंबीही दिली होती. मंगळवारी ही कारवाई टळली असली तरी भविष्यात ती होणार असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.

रहिवाशांच्या दबावापुढे जिल्हा प्रशासन नरमले

दिव्यातील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा प्रशासनाच्या पथकाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जवळपास ४ ते ५ हजार रहिवाशी या ठिकाणी जमा झाले होते. कारवाईसाठी आणलेल्या जेसीबीच्या समोरच अनेक जण येऊन उभे राहिल्याने वातावरण चांगलेच तापले होते. अनेक जणांनी जेसीबीला पुढे येऊच दिले नाही. त्यामुळे प्रशासनानेदेखील नरमाईची भूमिका घेऊन तत्काळ कारवाई केली नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका