शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

दिव्यातील पाडकाम कारवाई १० दिवसांसाठी लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:59 IST

मुदत मागितल्याने प्रशासनाने घेतला काढता पाय

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील कांदळवणावर मागील तीन वर्षांपासून उभ्या राहिलेल्या चाळी आणि इमारतींवर कारवाईसाठी मंगळवारी गेलेल्या जिल्हा प्रशासनाला कारवाई न करताच खाली हात परतवावे लागले. कारवाईच्या ठिकाणी जवळपास ४ ते ५ हजारांपेक्षा अधिक नागरिक जमा झाल्याने काही काळ या ठिकाणचे वातावरण गंभीर झाले होते. न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा आणि न्यायालयातही जर विरोधात निर्णय लागला तर संसार हलवण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती शेकडो रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाला केली. त्यानुसार त्यांना १० दिवसांची मुदत दिल्याची माहिती ठाणे तहसीलदारांनी दिली.

दिव्यात खारफुटींची कत्तल करून त्यावर तीन वर्षांत उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी येथील बांधकामांवर कारवाई करण्यासाठीप्रशासनाचे पथक पोलीस बंदोबस्तात गेले होते. दिव्यातील साबे गावात ही १००० हून अधिकची बांधकामे असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार होती. मात्र, कारवाईच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने प्रशासनाला कारवाई करता आली नाही.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील सर्व्हे क्र मांक २३६, ७९, ८० आणि ७५ यावर कांदळवने नष्ट करून त्यावर बांधकामे उभारल्याचा दावा करून जिल्हाधिकारी कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला. यापूर्वी अशाच प्रकारे ठाणे महापालिकेने या भागातील काही बांधकामांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी प्रशासनाने या संदर्भात पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आदिक पाटील यांनी दिवा परिसरात बॅनरवर जाहीर नोटीस लावून येथील रहिवाशांना ९ डिसेंबरपर्यंत घरे रिकामी करण्याचे सांगितले होते. तसे न केल्यास बळजबरी घरे रिकामी करण्यात येतील व तो खर्च घरमालकांकडून वसूल करण्यात येईल, अशी तंबीही दिली होती. मंगळवारी ही कारवाई टळली असली तरी भविष्यात ती होणार असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे.

रहिवाशांच्या दबावापुढे जिल्हा प्रशासन नरमले

दिव्यातील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा प्रशासनाच्या पथकाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जवळपास ४ ते ५ हजार रहिवाशी या ठिकाणी जमा झाले होते. कारवाईसाठी आणलेल्या जेसीबीच्या समोरच अनेक जण येऊन उभे राहिल्याने वातावरण चांगलेच तापले होते. अनेक जणांनी जेसीबीला पुढे येऊच दिले नाही. त्यामुळे प्रशासनानेदेखील नरमाईची भूमिका घेऊन तत्काळ कारवाई केली नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका