शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

हक्काच्या ९० लीटर पाण्यासाठी दिवावासीयांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:30 IST

पिण्यासाठी हक्काचे ९० लीटर पाणी मिळावे, या मागणीसाठी दिव्यातील रहिवाशांनी दिवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले.

ठाणे : पिण्यासाठी हक्काचे ९० लीटर पाणी मिळावे, या मागणीसाठी दिव्यातील रहिवाशांनी दिवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले. नियमानुसार येथील नागरिकांना ठाण्याप्रमाणे प्रत्येक दिवशी प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी मिळायला हवे. यात पिण्याचे ९० लीटर आणि वापरण्यासाठी ४५ लीटर अपेक्षित आहे. मात्र, ते आजही मिळत नाही, पाण्याची वानवा आहे. त्यामुळेच हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.या प्रमुख मागणीसह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठीसुद्धा आंदोलन करण्यात आले. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होतो. परंतु, बिल मात्र महिन्याचे येते. यात अनेक नागरिकांना पिण्याचेच ९० लीटर पाणी मिळत नाही, तेथे वापरायचे पाणी कुठून मिळणार, चारचार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा कधी थांबणार, महिन्याचा पगार पाण्यासाठी खर्च होतो. तरीही सत्ताधाऱ्यांना जाग येत नसेल, तर हक्कासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून येथील नागरिक टँकरसाठी आठवड्याला एक हजार रु पये खर्च करत आहे, त्यामुळे तो पालिकेचे २०० रु पये पाणीबिल भरणार नाही का, असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी दिवा प्रभाग समितीसमोर धरणे आंदोलन केले. यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तर येत्या २ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयासमोर निषेध आंदोलनही केले जाणार असल्याची माहिती भाजपचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीdivaदिवाthaneठाणे