शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

दिवा डम्पिंग ग्राउंडचा वाद : कचऱ्यावरून सेना विरुद्ध सेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 03:13 IST

ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.दिव्यात डम्पिंग व्हावे, यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारानेच प्रशासनाला पत्र दिले होते. आता सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी डम्पिंग बंद करण्यासाठी लक्षवेधी मांडल्याने शिवसेनेच्या भूमिकेत सातत्य नाही. डम्पिंग बंद न झाल्यास होणाºया आंदोलनाची झळ प्रशासनाबरोबरच १३१ नगरसेवकांना सोसावी लागेल, असा राणाभीमदेवी थाटाचा इशारा त्यांनी शुक्रवारी दिला. ३१ डिसेंबरनंतर दिव्यात कचºयाची एकही गाडी फिरकू देणार नसल्याचा इशारा सेनेचेच नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिला. प्रशासनाने तीन महिन्यांची मुदत वाढवून घेत, सत्ताधाºयांना आश्वासनांचे गाजर दिले.उपमहापौरांच्या लक्षवेधीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला असला, तरी २५ वर्षांत डम्पिंग बंद करू न शकलेल्या सेनेला राष्ट्रवादी आणि भाजपाने टोले लगावले. मढवी यांच्या लक्षवेधीला नगरसेवक संतोष वडवले यांनी अनुमोदन दिले. पालिकेचा आराखडा तयार होऊन २० वर्षे झाल्यानंतरही कचºयाचा प्रश्न सुटला नाही. प्रशासनाने कचरा विल्हेवाटीसाठी प्रयत्न केले नाही. दिव्यात रहिवासी भागामध्ये ५ ते १० मीटरवर कचरा टाकला जातो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डम्पिंग बंद करण्याची तारीख जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.वनखात्याच्या खदाणीसाठी प्रयत्न केले नाही. खाजगी जागेत कचरा टाकला जातो. डम्पिंगसंदर्भात कधीही उठाव होईल. कचºयाची एकही गाडी दिव्यात जाऊ दिली जाणार नाही. मग, हा कचरा ठाणे शहरात गेला तर १३१ नगरसेवकांना याची झळ पोहोचेल, असा इशारा मढवी यांनी यावेळी दिला.दिव्यातील शिवसेनेचे आठही नगरसेवक यावेळी आक्रमक झाले. वास्तविक, दिव्यात खाजगी जागेत डम्पिंग व्हावे, यासाठी त्यांच्या पक्षातील आमदाराने प्रशासनाला पत्र दिले होते आणि आता त्यांच्याच विरोधात सेनेचे नगरसेवक अशी भूमिका घेत असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोट्यवधींचे प्रकल्प आणले जातात, मात्र डम्पिंगसाठी प्रयत्न होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शानू पठाण यांनी पाठिंबा देत रेतीबंदरपासूनच गाड्या अडवण्याचा इशारा दिला.अपर्णा साळवी यांनी उपमहापौरांना डम्पिंगवर लक्षवेधी मांडावी लागते, ही शोकांतिका असून, या मुद्यावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले. भाजपाचे नगरसेवक संदीप लेले यांनी शिवसेनेवर टीका करत देखाव्यांवर खर्च करण्यापेक्षा डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रशासनाने घेतली तीन महिन्यांची मुदतराज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी असूनही शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका वेळोवेळी वठवते. विरोधी पक्षाचे हे सोंग शिवसेना नेत्यांच्या अंगी इतके भिनले आहे की, ठाणे महानगरपालिकेत आपली स्वबळावर सत्ता असून डम्पिंगचा प्रश्न सोडवणे, ही आपली जबाबदारी आहे, याचाच सेनेला विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.मिलिंद पाटील म्हणाले, उपमहापौरांनी लक्षवेधी मांडणे हीच खेदाची बाब आहे. स्वत:चे आमदार, खासदार, पालकमंत्री असतानाही प्रश्न सुटत नाही, तर सत्ता घ्यायचीच कशाला, असा टोला त्यांनी लागवला. दिव्यातील नगरसेवक कधीही गाड्या बंद करू शकतात, मात्र त्यांनी ठाणेकरांचा विचार करून आतापर्यंत आंदोलन केले नसल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.कचरा निर्मूलनासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रकल्प सुरू असल्याची माहिती उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. त्यांच्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने डम्पिंग कधी बंद करणार, याची तारीख जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. अखेर येत्या तीन महिन्यांत डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.नवीन ठाण्यात डम्पिंग करावे : डम्पिंगचा प्रश्न गंभीर असून, वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्याकरिता नवीन ठाण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड नवीन ठाण्यात करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :dumpingकचराthaneठाणे