शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

दिवा डम्पिंग ग्राउंडचा वाद : कचऱ्यावरून सेना विरुद्ध सेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 03:13 IST

ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.दिव्यात डम्पिंग व्हावे, यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारानेच प्रशासनाला पत्र दिले होते. आता सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी डम्पिंग बंद करण्यासाठी लक्षवेधी मांडल्याने शिवसेनेच्या भूमिकेत सातत्य नाही. डम्पिंग बंद न झाल्यास होणाºया आंदोलनाची झळ प्रशासनाबरोबरच १३१ नगरसेवकांना सोसावी लागेल, असा राणाभीमदेवी थाटाचा इशारा त्यांनी शुक्रवारी दिला. ३१ डिसेंबरनंतर दिव्यात कचºयाची एकही गाडी फिरकू देणार नसल्याचा इशारा सेनेचेच नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिला. प्रशासनाने तीन महिन्यांची मुदत वाढवून घेत, सत्ताधाºयांना आश्वासनांचे गाजर दिले.उपमहापौरांच्या लक्षवेधीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला असला, तरी २५ वर्षांत डम्पिंग बंद करू न शकलेल्या सेनेला राष्ट्रवादी आणि भाजपाने टोले लगावले. मढवी यांच्या लक्षवेधीला नगरसेवक संतोष वडवले यांनी अनुमोदन दिले. पालिकेचा आराखडा तयार होऊन २० वर्षे झाल्यानंतरही कचºयाचा प्रश्न सुटला नाही. प्रशासनाने कचरा विल्हेवाटीसाठी प्रयत्न केले नाही. दिव्यात रहिवासी भागामध्ये ५ ते १० मीटरवर कचरा टाकला जातो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डम्पिंग बंद करण्याची तारीख जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.वनखात्याच्या खदाणीसाठी प्रयत्न केले नाही. खाजगी जागेत कचरा टाकला जातो. डम्पिंगसंदर्भात कधीही उठाव होईल. कचºयाची एकही गाडी दिव्यात जाऊ दिली जाणार नाही. मग, हा कचरा ठाणे शहरात गेला तर १३१ नगरसेवकांना याची झळ पोहोचेल, असा इशारा मढवी यांनी यावेळी दिला.दिव्यातील शिवसेनेचे आठही नगरसेवक यावेळी आक्रमक झाले. वास्तविक, दिव्यात खाजगी जागेत डम्पिंग व्हावे, यासाठी त्यांच्या पक्षातील आमदाराने प्रशासनाला पत्र दिले होते आणि आता त्यांच्याच विरोधात सेनेचे नगरसेवक अशी भूमिका घेत असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोट्यवधींचे प्रकल्प आणले जातात, मात्र डम्पिंगसाठी प्रयत्न होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शानू पठाण यांनी पाठिंबा देत रेतीबंदरपासूनच गाड्या अडवण्याचा इशारा दिला.अपर्णा साळवी यांनी उपमहापौरांना डम्पिंगवर लक्षवेधी मांडावी लागते, ही शोकांतिका असून, या मुद्यावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले. भाजपाचे नगरसेवक संदीप लेले यांनी शिवसेनेवर टीका करत देखाव्यांवर खर्च करण्यापेक्षा डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रशासनाने घेतली तीन महिन्यांची मुदतराज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी असूनही शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका वेळोवेळी वठवते. विरोधी पक्षाचे हे सोंग शिवसेना नेत्यांच्या अंगी इतके भिनले आहे की, ठाणे महानगरपालिकेत आपली स्वबळावर सत्ता असून डम्पिंगचा प्रश्न सोडवणे, ही आपली जबाबदारी आहे, याचाच सेनेला विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.मिलिंद पाटील म्हणाले, उपमहापौरांनी लक्षवेधी मांडणे हीच खेदाची बाब आहे. स्वत:चे आमदार, खासदार, पालकमंत्री असतानाही प्रश्न सुटत नाही, तर सत्ता घ्यायचीच कशाला, असा टोला त्यांनी लागवला. दिव्यातील नगरसेवक कधीही गाड्या बंद करू शकतात, मात्र त्यांनी ठाणेकरांचा विचार करून आतापर्यंत आंदोलन केले नसल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.कचरा निर्मूलनासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रकल्प सुरू असल्याची माहिती उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. त्यांच्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने डम्पिंग कधी बंद करणार, याची तारीख जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. अखेर येत्या तीन महिन्यांत डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.नवीन ठाण्यात डम्पिंग करावे : डम्पिंगचा प्रश्न गंभीर असून, वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्याकरिता नवीन ठाण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड नवीन ठाण्यात करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :dumpingकचराthaneठाणे