शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

दिवा डम्पिंग ग्राउंडचा वाद : कचऱ्यावरून सेना विरुद्ध सेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 03:13 IST

ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता असून दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून लोकांची सोडवणूक करणे, ही त्यांची जबाबदारी असताना शिवसेनेनेच या मुद्यावर आंदोलन करण्याचा व ३१ डिसेंबरनंतर कच-याची एकही गाडी येऊ न देण्याचा इशारा दिल्याने हसावे की रडावे, अशी ठाणेकरांची अवस्था झाली आहे.दिव्यात डम्पिंग व्हावे, यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारानेच प्रशासनाला पत्र दिले होते. आता सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी डम्पिंग बंद करण्यासाठी लक्षवेधी मांडल्याने शिवसेनेच्या भूमिकेत सातत्य नाही. डम्पिंग बंद न झाल्यास होणाºया आंदोलनाची झळ प्रशासनाबरोबरच १३१ नगरसेवकांना सोसावी लागेल, असा राणाभीमदेवी थाटाचा इशारा त्यांनी शुक्रवारी दिला. ३१ डिसेंबरनंतर दिव्यात कचºयाची एकही गाडी फिरकू देणार नसल्याचा इशारा सेनेचेच नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिला. प्रशासनाने तीन महिन्यांची मुदत वाढवून घेत, सत्ताधाºयांना आश्वासनांचे गाजर दिले.उपमहापौरांच्या लक्षवेधीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला असला, तरी २५ वर्षांत डम्पिंग बंद करू न शकलेल्या सेनेला राष्ट्रवादी आणि भाजपाने टोले लगावले. मढवी यांच्या लक्षवेधीला नगरसेवक संतोष वडवले यांनी अनुमोदन दिले. पालिकेचा आराखडा तयार होऊन २० वर्षे झाल्यानंतरही कचºयाचा प्रश्न सुटला नाही. प्रशासनाने कचरा विल्हेवाटीसाठी प्रयत्न केले नाही. दिव्यात रहिवासी भागामध्ये ५ ते १० मीटरवर कचरा टाकला जातो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डम्पिंग बंद करण्याची तारीख जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.वनखात्याच्या खदाणीसाठी प्रयत्न केले नाही. खाजगी जागेत कचरा टाकला जातो. डम्पिंगसंदर्भात कधीही उठाव होईल. कचºयाची एकही गाडी दिव्यात जाऊ दिली जाणार नाही. मग, हा कचरा ठाणे शहरात गेला तर १३१ नगरसेवकांना याची झळ पोहोचेल, असा इशारा मढवी यांनी यावेळी दिला.दिव्यातील शिवसेनेचे आठही नगरसेवक यावेळी आक्रमक झाले. वास्तविक, दिव्यात खाजगी जागेत डम्पिंग व्हावे, यासाठी त्यांच्या पक्षातील आमदाराने प्रशासनाला पत्र दिले होते आणि आता त्यांच्याच विरोधात सेनेचे नगरसेवक अशी भूमिका घेत असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोट्यवधींचे प्रकल्प आणले जातात, मात्र डम्पिंगसाठी प्रयत्न होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शानू पठाण यांनी पाठिंबा देत रेतीबंदरपासूनच गाड्या अडवण्याचा इशारा दिला.अपर्णा साळवी यांनी उपमहापौरांना डम्पिंगवर लक्षवेधी मांडावी लागते, ही शोकांतिका असून, या मुद्यावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले. भाजपाचे नगरसेवक संदीप लेले यांनी शिवसेनेवर टीका करत देखाव्यांवर खर्च करण्यापेक्षा डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रशासनाने घेतली तीन महिन्यांची मुदतराज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी असूनही शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका वेळोवेळी वठवते. विरोधी पक्षाचे हे सोंग शिवसेना नेत्यांच्या अंगी इतके भिनले आहे की, ठाणे महानगरपालिकेत आपली स्वबळावर सत्ता असून डम्पिंगचा प्रश्न सोडवणे, ही आपली जबाबदारी आहे, याचाच सेनेला विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.मिलिंद पाटील म्हणाले, उपमहापौरांनी लक्षवेधी मांडणे हीच खेदाची बाब आहे. स्वत:चे आमदार, खासदार, पालकमंत्री असतानाही प्रश्न सुटत नाही, तर सत्ता घ्यायचीच कशाला, असा टोला त्यांनी लागवला. दिव्यातील नगरसेवक कधीही गाड्या बंद करू शकतात, मात्र त्यांनी ठाणेकरांचा विचार करून आतापर्यंत आंदोलन केले नसल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.कचरा निर्मूलनासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रकल्प सुरू असल्याची माहिती उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. त्यांच्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने डम्पिंग कधी बंद करणार, याची तारीख जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. अखेर येत्या तीन महिन्यांत डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.नवीन ठाण्यात डम्पिंग करावे : डम्पिंगचा प्रश्न गंभीर असून, वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्याकरिता नवीन ठाण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड नवीन ठाण्यात करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :dumpingकचराthaneठाणे