शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

टंचाईच्या काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जि.प. सीईओंचा शहापूर ग्रामीण दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:15 IST

शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली.

ठळक मुद्देप्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होताया प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते.सौरउर्जेचे कामे अर्धवट सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनवणे यांनी शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम भागाचा दौरा करून अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली. ट्रॅकरने पाणी पुरवठा सुरु ळीत सुरु राहावा यासाठी शासनाच्या माध्यमातून जी.पी.एस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. पंचायत समिती स्तरावर या जीपीएस यंणेचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत यावर्षी दहा योजना मंजूर झाल्या आहेत. तसेच भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या दावा जिल्हा परिषद करीत आहे. एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा ही जिल्हा परिषद करीत आहे. तरी देखील या शहापूर तालुक्यात २९ टॅकरव्दारे गावखेड्यांना पाणी पुरवठा होत असल्याचे वास्तव मात्र जिल्हा परिषदेचा हा दावा फोल ठरवत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा टॅकरची संख्या देखील वाढलेली आहे. पूर्ण जिल्ह्यात गेल्या वर्षी २५ टॅकर लागले होते. यंदा शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये ३६ टॅकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे.मुख्यमंत्री पेयजल कार्यक्र मा अंतर्गत सरलांब आणि भातसे या गावांमध्ये या पाणी पुरवठा सुरु केल्याचे सांगितले जात आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत शहापूर तालुक्यात १९ विहीर खोलीकरणाचे कामे मंजूर असून ते अजून कागदांवरच आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते. यापैकी तीन योजनेचे पाणी पुरवठा सुरळीत सुरु केल्याचा दावा ही केला जात आहे. सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद पडलेले आहेत. सौरउर्जेचे कामे अर्धवट ठेवल्यामुळे ग्रामस्थाना या हातपंपाचा उपयोग होत नसल्याची गंभीर बाब निदर्शनात आलेली आहे. त्यावर मात्र जिल्हा परिषदेकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद