शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जि.प. सीईओंचा शहापूर ग्रामीण दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:15 IST

शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली.

ठळक मुद्देप्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होताया प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते.सौरउर्जेचे कामे अर्धवट सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनवणे यांनी शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम भागाचा दौरा करून अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली. ट्रॅकरने पाणी पुरवठा सुरु ळीत सुरु राहावा यासाठी शासनाच्या माध्यमातून जी.पी.एस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. पंचायत समिती स्तरावर या जीपीएस यंणेचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत यावर्षी दहा योजना मंजूर झाल्या आहेत. तसेच भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या दावा जिल्हा परिषद करीत आहे. एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा ही जिल्हा परिषद करीत आहे. तरी देखील या शहापूर तालुक्यात २९ टॅकरव्दारे गावखेड्यांना पाणी पुरवठा होत असल्याचे वास्तव मात्र जिल्हा परिषदेचा हा दावा फोल ठरवत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा टॅकरची संख्या देखील वाढलेली आहे. पूर्ण जिल्ह्यात गेल्या वर्षी २५ टॅकर लागले होते. यंदा शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये ३६ टॅकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे.मुख्यमंत्री पेयजल कार्यक्र मा अंतर्गत सरलांब आणि भातसे या गावांमध्ये या पाणी पुरवठा सुरु केल्याचे सांगितले जात आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत शहापूर तालुक्यात १९ विहीर खोलीकरणाचे कामे मंजूर असून ते अजून कागदांवरच आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते. यापैकी तीन योजनेचे पाणी पुरवठा सुरळीत सुरु केल्याचा दावा ही केला जात आहे. सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद पडलेले आहेत. सौरउर्जेचे कामे अर्धवट ठेवल्यामुळे ग्रामस्थाना या हातपंपाचा उपयोग होत नसल्याची गंभीर बाब निदर्शनात आलेली आहे. त्यावर मात्र जिल्हा परिषदेकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद