शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

जिल्हा नियोजन कार्यालय 1 एप्रिलपासून होणार पेपरलेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 15:59 IST

जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज आय-पास संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठाणे : जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज आय-पास संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिल २०२०पासून नियोजन विभागाचे कामकाज पेपरलेस होणार आहे. नियोजन विभागाशी संबंधित सर्व कामे एका क्लिकवर होणार असल्याने सर्व विभागांना या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी सर्व विभागांनी 1 जानेवारीपासून सर्व प्रस्ताव ऑनलाइन सादर करावे, अशा सूचना उपायुक्त बापूसाहेब सबनीस यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता एकदिवसीय आय-पास प्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना सबनीस यांनी सूचना दिल्या. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे उपस्थित होते. नियोजन विभागातील कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफिस ऑटोमेशन(आय-पास)प्रणाली विकसित करण्यात आली आहे.आय- पास ही संगणकीय यंत्रणा राज्यभर कार्यान्वित केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना ,आमदार निधी, खासदार निधी,डोंगरी विकास कार्यक्रम या सारख्या विविध योजनांच्या कामांना मान्यता,निधी वितरण, सर्वंकष मॉनेटरींग, जी.पी.एस.लोकेशन टॅगिंग, कामाची प्रगती तपासणे इत्यादी विविध बाबींचा समावेश आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिका-यांना आपल्या प्रस्तावाची सद्यस्थिती, निधी, प्रस्ताव पास झाला किंवा नाही हे एका क्लिकवर दिसणार आहे.जनतेसाठी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज संगणकीकृत होऊन सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती स्तरावर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील यांच्या अधिपत्याखाली सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून सदर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. सर्व विभाग प्रमुख आणि अधिनस्त कर्मचारी यांना युझर नेम व पासवर्ड तसेच हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे पूर्णत: संगणकीकरण करून कार्यालयातील कामकाज कागदविरहित (पेपरलेस) करण्याचे काम नाशिक येथील ईएसडीएस लि. या कंपनीकडे सोपविण्यात आले असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सांगितले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.