शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:18 IST

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

मीरारोड: निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमारांना खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफचे पथक तैनात असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज मंगळवारी तर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी सायंकाळी या परिसराची पाहणी केली. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी किनारा परिसराची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, उपअधीक्षक डॉ शशिकांत भोसले, सहाय्यक निरीक्षक एस. डी. निकम, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, एलायस बांड्यासह मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

यावेळी किनाऱ्यालगतच्या पहिल्या दोन रांगेतील घरे तसेच तिसऱ्या रांगेतील तळ मजल्यावर राहणाऱ्यांना खबरदारी म्हणून हलवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. वेलंकनी तीर्थ मंदिर आणि संत जोसेफ शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. किंवा मच्छीमारांनी आपल्या नातलगां कडे  थांबावे. एनडीआरएफचे 23 जणांचे पथक या भागासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय तटरक्षक दल, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

हलवण्यात येणाऱ्या मच्छीमार नागरिकांची व्यवस्था पालिका करणार असून अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथक तैनात केले आहे. चक्रीवादळ आल्यास कोणत्या अधिकाऱ्याने काय काम करायचे याची जबाबदारी आयुक्त डांगे यांनी आदेश काढून नेमून दिली आहे. 

किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले जात असले तरी त्यांची समजूत काढण्याची आवश्यकता असल्याने पोलीस, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, गाव जमात, नगरसेवक आदींनी याकामी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले आहे. 

समुद्रातील बहुतांश बोटी किनाऱ्यावर परतल्या असून उत्तन व चौकच्या प्रत्येकी 4 तर भाटे बंदराच्या 3 अशा 11 मच्छीमार बोटी परतीच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. किनाऱ्यावरील बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ