शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:18 IST

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

मीरारोड: निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमारांना खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफचे पथक तैनात असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज मंगळवारी तर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी सायंकाळी या परिसराची पाहणी केली. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी किनारा परिसराची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, उपअधीक्षक डॉ शशिकांत भोसले, सहाय्यक निरीक्षक एस. डी. निकम, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, एलायस बांड्यासह मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

यावेळी किनाऱ्यालगतच्या पहिल्या दोन रांगेतील घरे तसेच तिसऱ्या रांगेतील तळ मजल्यावर राहणाऱ्यांना खबरदारी म्हणून हलवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. वेलंकनी तीर्थ मंदिर आणि संत जोसेफ शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. किंवा मच्छीमारांनी आपल्या नातलगां कडे  थांबावे. एनडीआरएफचे 23 जणांचे पथक या भागासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय तटरक्षक दल, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

हलवण्यात येणाऱ्या मच्छीमार नागरिकांची व्यवस्था पालिका करणार असून अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथक तैनात केले आहे. चक्रीवादळ आल्यास कोणत्या अधिकाऱ्याने काय काम करायचे याची जबाबदारी आयुक्त डांगे यांनी आदेश काढून नेमून दिली आहे. 

किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले जात असले तरी त्यांची समजूत काढण्याची आवश्यकता असल्याने पोलीस, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, गाव जमात, नगरसेवक आदींनी याकामी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले आहे. 

समुद्रातील बहुतांश बोटी किनाऱ्यावर परतल्या असून उत्तन व चौकच्या प्रत्येकी 4 तर भाटे बंदराच्या 3 अशा 11 मच्छीमार बोटी परतीच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. किनाऱ्यावरील बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ