शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:18 IST

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

मीरारोड: निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमारांना खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफचे पथक तैनात असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज मंगळवारी तर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी सायंकाळी या परिसराची पाहणी केली. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.  

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी किनारा परिसराची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, उपअधीक्षक डॉ शशिकांत भोसले, सहाय्यक निरीक्षक एस. डी. निकम, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, एलायस बांड्यासह मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

यावेळी किनाऱ्यालगतच्या पहिल्या दोन रांगेतील घरे तसेच तिसऱ्या रांगेतील तळ मजल्यावर राहणाऱ्यांना खबरदारी म्हणून हलवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. वेलंकनी तीर्थ मंदिर आणि संत जोसेफ शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. किंवा मच्छीमारांनी आपल्या नातलगां कडे  थांबावे. एनडीआरएफचे 23 जणांचे पथक या भागासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय तटरक्षक दल, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

हलवण्यात येणाऱ्या मच्छीमार नागरिकांची व्यवस्था पालिका करणार असून अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथक तैनात केले आहे. चक्रीवादळ आल्यास कोणत्या अधिकाऱ्याने काय काम करायचे याची जबाबदारी आयुक्त डांगे यांनी आदेश काढून नेमून दिली आहे. 

किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले जात असले तरी त्यांची समजूत काढण्याची आवश्यकता असल्याने पोलीस, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, गाव जमात, नगरसेवक आदींनी याकामी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले आहे. 

समुद्रातील बहुतांश बोटी किनाऱ्यावर परतल्या असून उत्तन व चौकच्या प्रत्येकी 4 तर भाटे बंदराच्या 3 अशा 11 मच्छीमार बोटी परतीच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. किनाऱ्यावरील बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ