शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आरटीईच्या १३ हजार जागांसाठी जिल्ह्यातून २०,६६७ ऑनलाइन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:00 IST

शिक्षण विभागाची माहिती : आता सोडतीची अपेक्षा

सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार जिल्ह्यातील समाजामधील एससी, एसटी, वंचित आणि दुर्बल घटक प्रवर्गातील बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील ६६९ शाळांमधील प्रवेशांपैकी रिक्त ठेवलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी बुधवारी शेवटच्या मुदतीपर्यंत २० हजार ६६७ आॅनलाइन अर्ज जिल्हाभरातून प्राप्त झाले. त्यातून या आठवड्यात लॉटरी सोडतीद्वारे अपेक्षित शाळांमध्ये प्रवेश निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

१२ हजार ९१३ राखीव जागांवरील शालेय प्रवेशासाठी ६६९ शाळांची निवड केली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना प्रवेश मिळणार आहे. पूर्वप्राथमिकसाठी एक हजार ३३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

अंबरनाथ तालुक्यामधून एक हजार ९९५ अर्ज, भिवंडी-१ ला दोन हजार १९७, भिवंडीला ६३८, कल्याणला एक हजार ८८७, कल्याण-डोंबिवलीला दोन हजार २६६, मीरा-भार्इंदरला १६१, मुरबाडला ६२, ठाणे मनपा क्षेत्रात एक हजार ३४३, ठाणे मनपा २ मध्ये तीन हजार १४३ आणि उल्हासनगर शहरातून एक हजार ६३, नवी मुंबई पाच हजार ३००, तर शहापूरमधून ५९२ आॅनलाइन अर्ज प्रवेशासाठी आले आहेत.

एकूण प्रवेशासाठी वंचित घटकातील प्रवर्गास, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली बालके, दुर्बल घटक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले सर्व घटक, विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालक, एकाकी पालकांची बालके आदीना आॅनलाइन अर्ज दाखल करता येतो.शिक्षण हक्क कायद्यान्वये ठाणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी यंदाही लॉटरी सोडतद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यंदा सात हजार ७५४ ऑनलाइन अर्ज जास्त आले आहेत. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा