शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बीएसयूपी घरे वितरित करण्याचा मार्ग मोकळा; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 20:29 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून बांधून तयार असलेल्या तब्बल साडे तीन हजार घरांचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे.

कल्याण: 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून बांधून तयार असलेल्या तब्बल साडे तीन हजार घरांचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधलेली ही घरे तंत्रित अडचणींमुळे लाभार्थ्यांना दिली जात नव्हती. महापालिकेने राज्य शासनाला त्यासाठीचे पैसे बाजार भावानुसार अदा करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचविण्यात आला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर पालिकेने अदा करावे लागणारे पैसे माफ करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच बीएसयूपी घरांचा प्रश्न निकाली निघणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली सुमारे साडे तीन हजार घरे गेल्या काही वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना घरे असूनही इतरत्र राहावे लागते आहे. योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर काही काळात ही योजना बंद झाली. यात केंद्र शासनाला अदा करावा लागणारा पालिकेचा हिस्सा माफ करून घेण्यात यापूर्वीच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यश मिळवले. त्यानंतर या घरांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे राज्यशासनाला प्रति घरटी बाजारभावानुसार पैसे अदा करावे लागणार होते. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही घरे लाभार्थ्यांना मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार यापूर्वी सचिव स्तरावर एक बैठक पार पडली. मात्र म्हाडाच्या शासन निर्णयानुसार महापालिकेला बाजारभावानुसार राज्य शासनाला पैसे अदा करावे लागणार होते.  

सध्याच्या बाजारभावानुसार प्रति घरटी वीस लाख रुपये द्यावे लागणार होते. ही पालिकेच्या स्तरावर अशक्यप्राय गोष्ट असल्याने याबाबत सूट मिळावी या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. शहरातील प्रकल्पग्रस्तांना वेळेत ही घरे मिळावी अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. सोमवारी मंत्रालयात यासंदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेकडून शासनाला द्यावे लागणारे पैसे माफ करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले. लवकरच याबाबत ना हरकत दाखला शासनाकडून मिळणार आहे. त्यानंतर ही घरे वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सुमारे साडेतीन हजार घरांचा प्रश्न निकाली निघाला आहे. 

लवकरच या घरांचे वाटप केले जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी,कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना