शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:11 IST

रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत. 

मीरारोड - रेल्वेची कामे करणाऱ्या ३ मराठी भावंडांवर प्राणघातक करण्यात आल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून एका हल्लेखोरस अटक केली आहे.

भाईंदरच्या राई गावात राहणारे रूपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील हे आगरी समाजातील तिघे भाऊ मिळून रेल्वे व अन्य सरकारी कामे कंत्राटने घेतात. मंगळवारी सायंकाळी हे तिघे भाऊ, रूपेश यांचा मुलगा यश व सहकारी संकेत म्हात्रे हे भाईंदर पश्चिम धक्काजवळ रेल्वे अधिकारी यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी तेथे रेल्वेचे कंत्राट घेणारा जयेश माजलकर सह महेश शेट्टी, राहुल शर्मा व त्यांचे अन्य ४- ५ साथीदार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले.  माझ्या कंपनीला रेल्वेने बॉयकॉट केले असे लोकांना का खोटे का बोलत आहे? असं रूपेश यांनी जयेशला विचारणा केली. त्याचा राग येऊन जयेश, शेट्टी, शर्मा आणी अन्य साथीदार हे त्या सर्वांच्या अंगावर धावून धक्कबुक्की व मारहाण सुरु केली.

रूपेश यांना हृदयविकाराचा आजार असल्याने त्यांना वाचवण्यासाठी भूषण व नितेशमध्ये आले असता जयेश याने गाडीतील लोखंडी रॉड काढून भूषणच्या पायावर व डोक्यावर मारुन जखमी केले. महेश शेट्टी, शर्मा व अन्य साथीदार यांनी गाडीतून लोखंडी रॉड, लाकडी दांडे, चॉपर काढून रूपेश, भूषण, नितेश यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. नितेशच्या डोक्यावर रॉड  मारला. जयेश व साथीदारांनी, आमच्या नादी लागल्यास घरी येवून जीव घेऊ अशी धमकी दिली. रक्तबंबाळ झालेले तिघे भाऊ हे जीव वाचवून गाडीतून निघून जात असताना गाडीवर हाताने व काठीने फटके मारले. त्यांनी पोलिसांना मदतीसाठी कॉल केला, मात्र जीवाच्या भीतीने तेथे न थांबता निघून गेले.  पोलिस त्यांना बॉम्बे मार्केट नाक्याजवळ भेटले. भूषण व नितेश यांच्या चेहरा, डोक्याला जखमा होऊन रक्त वाहत होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत. 

प्राणघातक हल्ला करून खंडणीचा बनाव 

पाटील बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर ते जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना हल्लेखोरांनी व्हिडिओ काढून सांगा किती खंडणी पाहिजे? अशी विचारणा करत व्हिडिओ बनवला. नंतर राहुल शर्मा हा पोलिस ठाण्यात जाऊन पाटील बंधूंवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

टॅग्स :railwayरेल्वेmarathiमराठी