शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:11 IST

रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत. 

मीरारोड - रेल्वेची कामे करणाऱ्या ३ मराठी भावंडांवर प्राणघातक करण्यात आल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून एका हल्लेखोरस अटक केली आहे.

भाईंदरच्या राई गावात राहणारे रूपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील हे आगरी समाजातील तिघे भाऊ मिळून रेल्वे व अन्य सरकारी कामे कंत्राटने घेतात. मंगळवारी सायंकाळी हे तिघे भाऊ, रूपेश यांचा मुलगा यश व सहकारी संकेत म्हात्रे हे भाईंदर पश्चिम धक्काजवळ रेल्वे अधिकारी यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी तेथे रेल्वेचे कंत्राट घेणारा जयेश माजलकर सह महेश शेट्टी, राहुल शर्मा व त्यांचे अन्य ४- ५ साथीदार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले.  माझ्या कंपनीला रेल्वेने बॉयकॉट केले असे लोकांना का खोटे का बोलत आहे? असं रूपेश यांनी जयेशला विचारणा केली. त्याचा राग येऊन जयेश, शेट्टी, शर्मा आणी अन्य साथीदार हे त्या सर्वांच्या अंगावर धावून धक्कबुक्की व मारहाण सुरु केली.

रूपेश यांना हृदयविकाराचा आजार असल्याने त्यांना वाचवण्यासाठी भूषण व नितेशमध्ये आले असता जयेश याने गाडीतील लोखंडी रॉड काढून भूषणच्या पायावर व डोक्यावर मारुन जखमी केले. महेश शेट्टी, शर्मा व अन्य साथीदार यांनी गाडीतून लोखंडी रॉड, लाकडी दांडे, चॉपर काढून रूपेश, भूषण, नितेश यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. नितेशच्या डोक्यावर रॉड  मारला. जयेश व साथीदारांनी, आमच्या नादी लागल्यास घरी येवून जीव घेऊ अशी धमकी दिली. रक्तबंबाळ झालेले तिघे भाऊ हे जीव वाचवून गाडीतून निघून जात असताना गाडीवर हाताने व काठीने फटके मारले. त्यांनी पोलिसांना मदतीसाठी कॉल केला, मात्र जीवाच्या भीतीने तेथे न थांबता निघून गेले.  पोलिस त्यांना बॉम्बे मार्केट नाक्याजवळ भेटले. भूषण व नितेश यांच्या चेहरा, डोक्याला जखमा होऊन रक्त वाहत होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रूपेश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भाईंदर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा सह अन्य ४- ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल शर्मा याला अटक केली असून बाकीचे आरोपी मात्र पसार झाले आहेत. 

प्राणघातक हल्ला करून खंडणीचा बनाव 

पाटील बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर ते जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना हल्लेखोरांनी व्हिडिओ काढून सांगा किती खंडणी पाहिजे? अशी विचारणा करत व्हिडिओ बनवला. नंतर राहुल शर्मा हा पोलिस ठाण्यात जाऊन पाटील बंधूंवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

टॅग्स :railwayरेल्वेmarathiमराठी