शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ठाण्यात महाविकास आघाडीत कुरघोडी; मंत्री जितेंद्र आव्हाड अन् एकनाथ शिंदेंमध्येच जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:57 IST

ठाणे जिल्हा ताब्यात ठेवायचा असेल, तर अहंकार बाजूला ठेवून चर्चा करा, आव्हाड म्हणाले तर शिवसेनेने आजवर कधीच फायदा, तोटा पाहून काम केले नाही, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर  

नवी मुंबई :  ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेच्या एप्रिल महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांत कलगीतुरा पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करायची की नाही, याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र जिल्हा ताब्यात ठेवायचा असल्यास अहंकार बाजूला ठेवून शिवसेनेने महाविकास आघाडीबाबत चर्चा करावी, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना केले आहे. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. कारण आघाडी दोन्ही पक्षांच्या फायद्याची आहे.  काही ठिकाणी शिवसेनेची, तर काही ठिकाणी आमची ताकद आहे. त्यानुसार चर्चा होण्याची गरज आहे. परंतु शिवसेनेने एकला चलो... ची भूमिका घेतल्यास त्याचा फटका दोघांनाही बसण्याची शक्यता आहे, असे आव्हाड यांनी म्हटले होते.

एकूणच महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा असली तरी शिवसेनेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. गुरुवारी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना याबाबत छेडले असता, शिवसेना फायद्या-तोट्याचा कधीच विचार करीत नसल्याचा पलटवार त्यांनी केला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी कोणाची मने दुखावतील अशी वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला सुध्दा शिंदे यांनी आव्हाड यांना दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमधील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वाक्युध्दामुळे भाजपचे मात्र मनोरंजन होताना दिसत आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthaneठाणे