शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ठाण्यात महाविकास आघाडीत कुरघोडी; मंत्री जितेंद्र आव्हाड अन् एकनाथ शिंदेंमध्येच जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:57 IST

ठाणे जिल्हा ताब्यात ठेवायचा असेल, तर अहंकार बाजूला ठेवून चर्चा करा, आव्हाड म्हणाले तर शिवसेनेने आजवर कधीच फायदा, तोटा पाहून काम केले नाही, एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर  

नवी मुंबई :  ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेच्या एप्रिल महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांत कलगीतुरा पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करायची की नाही, याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र जिल्हा ताब्यात ठेवायचा असल्यास अहंकार बाजूला ठेवून शिवसेनेने महाविकास आघाडीबाबत चर्चा करावी, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना केले आहे. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. कारण आघाडी दोन्ही पक्षांच्या फायद्याची आहे.  काही ठिकाणी शिवसेनेची, तर काही ठिकाणी आमची ताकद आहे. त्यानुसार चर्चा होण्याची गरज आहे. परंतु शिवसेनेने एकला चलो... ची भूमिका घेतल्यास त्याचा फटका दोघांनाही बसण्याची शक्यता आहे, असे आव्हाड यांनी म्हटले होते.

एकूणच महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा असली तरी शिवसेनेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. गुरुवारी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना याबाबत छेडले असता, शिवसेना फायद्या-तोट्याचा कधीच विचार करीत नसल्याचा पलटवार त्यांनी केला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी कोणाची मने दुखावतील अशी वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला सुध्दा शिंदे यांनी आव्हाड यांना दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमधील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वाक्युध्दामुळे भाजपचे मात्र मनोरंजन होताना दिसत आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthaneठाणे