शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

बीएसयूपीवर सभेत चर्चा, नगरसेविका मीरादेवी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 04:00 IST

००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही.

भार्इंदर - २००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. गेल्या चार वर्षांपासून लाभार्थ्यांचे भाडे पालिकेकडून थकवण्यात आले आहे. हे भाडे लाभार्थ्यांना त्वरित द्यावे तसेच योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी भाजपा नगरसेविका मीरादेवी यादव यांनी शनिवारी विशेष महासभेत केली.२००९ मध्ये काशिमीरा येथील जनतानगर व काशीचर्च परिसरात बीएसयूपी योजना राबवण्यास मान्यता मिळाल्यानंतर त्यात चार हजार १३६ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. सुरुवातीला आठ मजल्यांच्या एकूण २३ इमारती प्रस्तावित केल्यानंतर आतापर्यंत केवळ एका आठ मजली इमारतीचे काम पूर्ण होऊन त्यात १७९ लाभार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे. सुमारे २६०० लोकांचेच स्थलांतर अद्याप झाले असून १५०० लाभार्थ्यांनी अद्याप आपली जागा रिकामी केलेली नाही. त्यातील सुमारे एक हजार लाभार्थ्यांना भाड्यापोटी दरमहा तीन हजार रुपये पालिकेकडून दिले जातात. उर्वरित लाभार्थ्यांना पालिकेच्या संक्रमण शिबिरासह एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले आहे. या रेंगाळलेल्या योजनेतील २१४ लाभार्थ्यांनाच प्रशासनाकडून भाडे देण्यात आले असून उर्वरित लाभार्थ्यांना २०१४ पासून भाडे दिलेले नाही. त्यामुळे लोकांना उत्तरे देताना आमची पंचाईत होते, त्यांना त्वरित भाडे दिले जावे, अशी मागणी मीरादेवी यांनी केली. त्यावर आयुक्तांनी २५० लाभार्थ्यांना भाडे दिल्याचा दावा केला. उर्वरित लाभार्थ्यांना भाडे देण्यासाठी एक कोटी तीन लाखांच्या निधीला नुकतीच मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात योजनेचा खर्च वाढल्याने एकूण जागेपैकी २५ टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी विकसित करून योजनेचा खर्च भरून काढण्याचा निर्णय पालिकेने दोन वर्षांपूर्वी घेतला. सध्या एक आठ मजली व सहा १६ मजली इमारतींचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाढीव खर्चामुळे योजना रेंगाळल्याने ही योजना पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ८० टक्के अनुदान व २.५ ऐवजी चार चटईक्षेत्र निर्देशांक मिळणार असल्याने योजना दोन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. हे आश्वासन प्रशासनाकडून सतत दिले जात असून ते कधीच पूर्ण केले जात नसल्याने गेल्या नऊ वर्षांपासून रेंगाळलेली ही योजना लवकर पूर्ण करावी, अशी मागणी मीरादेवी यादव यांनी केली.प्रशासन लोकांसह लोकप्रतिनिधींना फसवतेआयुक्तांनी योजनेच्या पूर्णत्वासाठी पालिकेने सुमारे १५० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव येत्या डिसेंबरमध्ये एमएमआरडीएकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. २६ जुलैच्या महासभेत मंजूर झालेल्या ठरावानंतरही प्रशासनाला कार्यवाहीसाठी तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागतो, यावर आश्चर्य व्यक्त करून प्रशासन लोकांसह लोकप्रतिनिधींना फसवत असल्याचा आरोप मीरादेवी यांनी केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर