शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

उल्हासनगर दलित वस्तीतील रस्ता गायब, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:38 IST

दलितवस्ती निधीतील रस्ताच गायब झाल्याची तक्रार भारिपच्या नगरसेविका कविता बागुल यांनी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

उल्हासनगर : दलितवस्ती निधीतील रस्ताच गायब झाल्याची तक्रार भारिपच्या नगरसेविका कविता बागुल यांनी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकाराने महापालिका बांधकाम विभाग वादात सापडला असून दलितवस्तीच्या कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी सर्वस्तरांतून होत आहे.उल्हासनगर पालिकेतील दलितवस्तीच्या विकासासाठी राज्य शासनाने २०१६-१७ मध्ये तीन कोटी ८० लाखांच्या निधीला मान्यता दिली. या निधीतून रस्ते, पायवाटा, नाले, पाण्याचे पाइप टाकणे आदी कामांना मंजुरी दिली असून बहुतांश कामे पूर्ण झालीत. या कामांची बिलेही काढण्यात आली आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक-१७ मध्ये एका रस्त्याच्या कामालाही मान्यता दिली आहे. रस्ता न बांधताच बिले काढल्याचा आरोप प्रभागातील काँग्रेस नगरसेविका अंजली साळवे आणि भारिपच्या कविता बागुल यांनी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. या प्रकाराने दलितवस्तीच्या निधीतील कामावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून सर्वच कामांच्या चौकशीची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. नगरसेविका बागुल यांच्या तक्रारीची दखल जिल्हाधिकाºयांनी घेऊन दलितवस्तीच्या कामाच्या दर्जाची आणि कामे झाली की नाही, याची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांना दिले.दलितवस्तीच्या विकासासाठी राज्य शासन दरवर्षी कोट्यवधींचा निधी महापालिकेला देते. तरीही, दलितवस्तीचा विकास का नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. निधीतून होणारी बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने, दुसºयाच वर्षी तीच कामे महापालिकेला करावी लागत असल्याचे चित्र शहरात आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर असताना, रस्त्यांऐवजी नाले व पायवाटांचे काम केल्याची माहिती महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी स्वत:चे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. मग, रस्ता कुठे गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे प्रकार बहुतांश कामात झाल्याने, दलितवस्तीच्या निधीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. यापूर्वी दलितवस्तीच्या निधीतून बांधलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची वेळ पालिकेवर आली आहे.