शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आश्रमशाळांवर आली सक्रांत विद्यार्थ्यांची गैरसोय; सुविधांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:09 IST

जाणीवपूर्वक होत आहे दुर्लक्ष

संजय भालेराव आसनगाव : सरकारने कोट्यवधी खर्च करत आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा विकास होण्यासाठी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. मात्र सुविधांअभावी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूरच्या अनेक आदिवादी आश्रमशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत प्रकल्प अधिकारी उदासीन असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे उघड झाले आहे.

शहापूर तालुक्यातील आंबिवली माध्यमिक आश्रमशाळा येथे सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जात असून २१८ मुले, १६० मुली असे एकूण ३७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थिनी भाड्याच्या घरात दाटीवाटीने राहतात. तेथे स्नानगृह व स्वच्छतागृह यांची संख्या फार कमी असल्याने मुलींची मोठी गैरसोय होते. आश्रमशाळा व मुलींसाठी भाड्याने घेतलेले घर यामध्ये अर्ध्या किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असल्याने मुलींसाठी हे धोक्याचे असून १३५ मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थिंनी शाळा सोडून जात आहेत. या कारणास्तव विद्यार्थी संख्या कमी होत आहे. नव्याने बांधलेल्या आश्रमशाळेत मुलींच्या वसतिगृहाचे काम सुरू आहे. परंतु त्यासाठी असलेली सर्व रक्कम काढल्याचे बोलले जात आहे. आश्रमशाळेत अपुरी स्वच्छतागृहे असल्याने अनेक विद्यार्थी उघड्यावरच प्रातर्विधीस जातात. विद्यार्थी आंघोळीसाठी नदीवर जातात.विद्यार्थीच करतात स्वच्छतासध्या शाळेत तीन स्वच्छतागृहांची तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र मुलांसाठी एकही स्नानगृह नाही. तर भाड्याने घेतलेल्या मुलींच्या विश्रामगृहात दोन स्वच्छतागृहे, तीन स्नानगृहे आहेत. या स्वच्छतागृह व स्नानगृहाचे दरवाजे तुटलेले आहेत.तसेच या आश्रमशाळेत शिपाई, कर्मचारी असूनही कार्यालयाची स्वच्छता विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जाते. तर मुलींच्या आरोग्य तपासणीच्या दिवशी अधीक्षक व अधीक्षिका उपस्थित राहत नसल्याची तक्र ार मुलींच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे ३७८ विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय सोय होत आहे. या गंभीर बाबींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करून येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुविधा पुरवाव्यात व १३५ निवासी आदिवासी मुलींचा सुरक्षेचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी पालकांनी केली आहे.