शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते - सतीश मराठे 

By नितीन पंडित | Updated: January 10, 2023 18:22 IST

कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतल्यास अर्थकारण बदलू शकते असे आरबीयचे संचालक सतीश मराठे यांनी म्हटले. 

भिवंडी : भारत कृषीप्रधान देश असून या देशात कृषी प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.या उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासाठी ग्रामीण पतसंस्थांनी पुढाकार घेतला तर ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांचे अर्थकारण बदलू शकते,तेथील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो असे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केले आहे.सोमवारी ते पडघा येथील गिरीराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, पडघा पतसंस्थेचे अध्यक्ष तथा पडघा ग्राम पंचायत सरपंच अमोल बिडवी,सचिव दिनेश गंधे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतात कृषी उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव असून त्याबाबतचे तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध होत असल्याने पतसंस्थांनी पुढाकार घेऊन जर कृषी प्रक्रिया उद्योग,त्या सोबतच कृषी मालाची साठवणूक करणारे शितगृह उभारले तर शेतकरी आपला शेतीमाल त्या ठिकाणी साठवणूक करून बाजारात चांगला भाव मिळेल त्या वेळेस ते उत्पन्न विकून चांगला नफा शेतकरी मिळवू शकतो व त्याच्या आर्थिक उन्नती साठी स्थानिक पतसंस्था मदत करणाऱ्या झाल्या तर या भारताचे चित्र बदलू शकते असे सांगत समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पतसंस्था,विविध विकास सोसायटी पोहचत असल्याने केंद्र व राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहण्याची गरज आहे असे मत देखील शेवटी सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

मन्नीपुरम, मुथुट यासारख्या परप्रांतातील सोने तारण कर्ज देणाऱ्या खाजगी कंपन्या राज्यातील पतसंस्थांवर अतिक्रमण करीत आहेत.फसव्या व्याजदरात अनेकांना भरडत असताना महाराष्ट्रातील पतसंस्थांनी आत्मपरीक्षण करून पतसंस्थांनी लॉकर सुविधा सुरू करण्यापेक्षा सुरक्षित सोने तारण कर्ज देण्याकडे आपला कल वाढवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले.तर गिरीराज ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक ताळेबंदाचा हवाला देत कर्ज परतावा शून्य टक्के ठेवून भागधारकांना भरीव फायदा देत सहकार विभागाने घालून दिलेल्या नियमांपेक्षा अधिक चांगल्या सुरक्षित ठेवल्याने  आपल्या भागधारकांचा विश्वास संपादन केल्या बद्दल गिरीराज पतसंस्थेच्या संचालक, कर्मचारी वर्गाचे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते पतसंस्थेचे संस्थापक कै बीपीनचंद्र ठक्कर यांच्या कुटुंबियांसह ,संस्थेचे आजीमाजी संचालक ,कर्मचारी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कराडकर यांनी केले.तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने भागधारक खातेदार उपस्थित होते.

  

टॅग्स :thaneठाणेReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक