शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद : सेव्ह द डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 23:28 IST

१ जुलैच्या राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांसंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे शहराध्यक्ष डॉ. दिनकर देसाई यांच्याशी साधलेला संवाद...

- पंकज रोडेकरमध्यंतरी, डॉक्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून डॉक्टर संघटनांनी आंदोलन पुकारले. १ जुलैच्या राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांसंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे शहराध्यक्ष डॉ. दिनकर देसाई यांच्याशी साधलेला संवाद...

डॉक्टर हल्ल्याबाबत काय सांगाल ?जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू हा अटळच आहे. त्यातच, डॉक्टर हा कोणी देव नाही. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे बºयाच विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. जो येतो, तो आपल्या जीवावर उदार होऊन येत आहे. त्यातच, सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्रास देण्यापूर्वी समाजाने विचार करणे गरजेचे आहे. ‘सेव्ह द टायगर’ याप्रमाणे आता ‘सेव्ह द डॉक्टर आणि सेव्ह द सेव्हिअर’, असे म्हणावे लागत आहे.या हल्ल्यात नेमके कोणाचे चुकते?एखादा रु ग्ण रु ग्णालयात उपचारार्थ दाखल झाला, तर त्या रु ग्णाबाबत त्याच्याजवळच्या प्रत्येक नातेवाइकाला वाटते की, डॉक्टरांनी आपल्याला माहिती द्यावी. पण, प्रत्येकाला माहिती देणे त्या डॉक्टरला शक्य नसते. अशावेळी संयमकिंवा धीर कोणी ठेवत नाहीत. त्यातूनच, बरेच जण कायदा हातात घेतात.यावर काय करता येईल ? आणि कोणी पुढाकार घ्यावा ?लोकसभेत महाराष्ट्रातील सात डॉक्टर निवडून गेले आहेत. त्यापैकी दोघांनीच डॉक्टरांच्या हल्ल्यांबाबत संसदेत प्रश्न मांडले आहेत. त्यातच, डॉक्टर हल्ल्यांबाबत सरकारला जाणीव आहे. तशी नागरिकांनाही याबाबत समज आली पाहिजे.हल्ल्याचा निषेध नोंदवताना गोरगरीब रूग्णांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे ?निषेध नोंदवताना, इर्मजन्सी सेवा सुरू असते. निषेध हा सहा ते बारा तासांचा असतो. यावेळी फक्त ओपीडी यासारख्या काही सेवा बंद असतात.तुम्ही संघटनेच्या वतीने डॉक्टर आणि रु ग्णांच्या नातेवाइकांना काय सल्ला द्याल?मृत्यूची माहिती पचवणेही अशक्य बाब आहे. त्यात कोणी अमर नाही. तसेच डॉक्टरही देवाचा अवतार नाही. हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही हातात कायदा घेऊ नये. डॉक्टरांकडून हलगर्जी किंवा उपचारांत निष्काळजीपणा असल्यास कायदेशीर पद्धतीने लढा द्यावा. मारहाण किंवा तोडफोड करणे अयोग्य आहे. तसेच तो गंभीर गुन्हा असल्याने कोणीही कायदा हाती घेऊ नये, एवढेच सांगावेसे वाटते.डॉक्टरांवरील हल्ल्यांप्रकरणी २०१० पासून एकही शिक्षा ठोठावली गेलेली नाही. त्यामुळे, याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करणे हाच एकमेव उपाय आहे.- डॉ. दिनकर देसाई, आयएमए, ठाणे अध्यक्ष

टॅग्स :thaneठाणे