शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

ठाण्यातील दोन सेनांच्या थेट लढतीमुळे चुरस वाढली; भाजप, सेनेच्या मतदानावर विजयाचे गणित अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 07:40 IST

ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त वैद्यकीय अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने तिरंगी लढतीची निर्माण झालेली शक्यता मावळली.

अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून ठाणे लोकसभेत २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशीच होणार आहे. या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा स्व. आनंद दिघे यांच्या अवतीभवती फिरणार असल्याचे दिसत आहे. ठाण्याचा गड कोण राखणार, दिघेंचा कोणता शिष्य दिल्लीत जाणार, याचे औत्सुक्य आहे. 

ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त वैद्यकीय अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने तिरंगी लढतीची निर्माण झालेली शक्यता मावळली. आता ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच लढत या मतदारसंघात होणार आहे. म्हस्के किंवा विचारे हे दोघेही स्व. दिघे यांच्या तालमीत तयार झाले. दिघे यांच्या शब्दाला दोघांकडून सन्मान दिला जात होता. मतदानाची तारीख जवळ येत जाईल तसा निवडणुकीचा प्रचार हा अधिक वैयक्तिक पातळीवरील टीकेपर्यंत जाईल, असे संकेत परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपाने दिले आहेत. दोन्ही उमेदवारांकडून दिघे कार्ड खेळले जाणार असून निष्ठावंत व गद्दार याच मुद्द्याभोवती निवडणूक घुटमळेल, असे दिसते. ठाणे जिल्हा हा धर्मवीरांचा बालेकिल्ला होता. त्यानंतर हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. आजतागायत ठाण्याचा गड शिंदे यांच्याकडून कुणालाही खेचून घेता आलेला नाही.

दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याचा बालेकिल्ला महत्वाचा मानला जात आहे. ठाकरे यांना ठाण्यानेच पहिली सत्ता दिली होती. मागील २५ वर्षे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा अबाधित ठेवण्यात शिवसेनेला यश आले. आतापर्यंत ठाण्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस लढत झाली. यावेळी प्रथमच दोन शिवसेनेत लढत होत आहे. येत्या १२ मे रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची म्हस्के यांच्यासाठी सभा आयोजित केली आहे. राज यांच्या सभेचा म्हस्के यांना कसा व किती फायदा होतो ते निकालानंतर समजेल.

ठाण्यातील भाजप व रा. स्व. संघाची मते ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरिता दिली जातील, असे भाजपचे नेते सांगतात. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला कळवा, मुंब्रा-दिवा परिसर कल्याण मतदारसंघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचा ठाण्यात प्रभाव नाही. ठाणे शहरातील शिवसेनेची मते कशी पडतात त्यावरच उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :naresh mhaskeनरेश म्हस्केrajan vichareराजन विचारेthane-pcठाणे