शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

थेट ५० टक्के रिक्षा भाडेवाढ, अंबरनाथमधील रिक्षाचालकांचा परस्पर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 03:19 IST

अंबरनाथमधील सर्व आॅटो रिक्षा सीएनजी झाल्या असून या रिक्षा चालकांनी शासकीय नियमांची पायमल्ली करून परस्पर रिक्षा भाडेवाढ केली आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ - अंबरनाथमधील सर्व आॅटो रिक्षा सीएनजी झाल्या असून या रिक्षा चालकांनी शासकीय नियमांची पायमल्ली करून परस्पर रिक्षा भाडेवाढ केली आहे. ही भाववाढ ५-१० टक्के नसून थेट ५० टक्के भाववाढ केली आहे. रिक्षा स्टँडवर लहानसा फलक लावून ही दरवाढ जाहीर केली असून प्रवाशांवर ती लादण्यात आली आहे. या भाववाढीबाबत प्रादेशिक परिवहन विभाग आणि स्थानिक वाहतूक विभागाचे अधिकारीदेखील कोणतीच कारवाई करीत नाहीत.अंबरनाथमधील रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. रिक्षा भाडेवाढ करण्याचा कोणताचा अधिकार हा रिक्षा चालकांना किंवा त्यांच्या संघटनांना नाही. असे असतानाही बदलापूरप्रमाणे अंबरनाथमधील काही रिक्षा संघटनांनी परस्पर रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच त्यांची अंमलबजावणीदेखील केली. अंबरनाथमधील बहुसंख्य रिक्षा ह्या शेअर सिटवर चालविण्यात येतात. विशेष म्हणजे, स्टँडवरील रिक्षा चालकांनी कधीही नियमाप्रमाणे तीन सीट भरलेले नाहीत. पाच सिट भरत नाहीत तोवर स्टँडवरून रिक्षा काढली जात नाही. त्यामुळे स्टँडवर लांबच लांब रांगा लागतात. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे केवळ तीन सिट घेण्याचे आदेश आहेत. मात्र त्याच आदेशाला बगल देण्याचे काम रिक्षा चालक करीत आहेत. त्यातच अंबरनाथ बी केबीन रोडवरील साईनाथ रिक्षा चालक मालक संघटनेने आपल्या फलकावर एक सूचना प्रसिद्ध करून रिक्षाची ५० टक्के भाडेवाढ केली आहे.अंबरनाथमधील नोंदणीकृत रिक्षा संघटनांना विश्वासात न घेता ही भाडेवाढ केल्याचे समोर येत आहे. मुळात भाडेवाढीसंदर्भातील प्रस्ताव हा प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रलंबित आहे. त्या भाडेवाढीवर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र रिक्षांची देखभाल दुरुस्ती, इंधनाचे वाढते दर आणि रिक्षाच्या पार्टचे वाढलेले दर याचे कारण पुढे करून ही दरवाढ करण्यात आलेली आहे. मात्र या दरवाढीला कायदेशीर मान्यता नाही. रिक्षा संघटनांनी परस्पर निर्णय घेत ही भाडेवाढ केली आहे. त्यामुळे ही भाडेवाढ म्हणजे प्रवाशांवर लादलेली दादागिरी असल्याचे समोर आले आहे. या दरवाढीमुळे प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यातही मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. मात्र संघटनेचा निर्णय झाल्याचे कारण पुढे करून रिक्षा चालकही जबरदस्तीने प्रवाशांकडून वाढीव पैसे घेत आहेत.यासंदर्भात अंबरनाथ वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी भाडेवाढीसंदर्भात आपल्यापर्यंत कोणतीच तक्रार आलेली नाही, असे कारण पुढे करत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र परस्पर भाडेवाढ करता येत नाही हे सांगून रिक्षा संघटनांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे. तर दुसरीकडे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असून भाडेवाढ करताना प्रत्येक रिक्षा चालकाला केवळ तीन सिट भरण्याची सक्ती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या सक्तीमुळे सर्व रिक्षा चालकांना व्यवसाय मिळण्यास मदत होईल, असेही स्पष्ट केले. दरम्यान, ही बेकायदेशीर भाडेवाढ रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जातआहे.दोन - अडीच किमीसाठी १५ रुपयेबी केबीन रोडवरील स्टँडवरून सुटणारी रिक्षा नवरेनगर आणि हरिओम पार्कपर्यंत जाण्यासाठी शेअर भाडे म्हणून १० रुपये आकारण्यात येत होते. आता हाच दर थेट १५ रुपये करण्यात आला आहे. नवरेनगर, हरिओम पार्क आणि ग्रीन सिटीपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला आता १० रुपयांऐवजी थेट १५ रुपये मोजावे लागणार आहेत. एखाद्या प्रवाशाने थेट रिक्षा नेल्यास त्याला ४५ रुपये मोजावे लागणार आहेत. मुळात नवरेनगरपर्यंतचे अंतर हे अवघे दोन ते अडीच किलोमीटरचे आहे. एवढ्या लहान अंतरासाठीदेखील प्रवाशांकडून थेट ५० टक्के भाडेवाढ आकारण्यात येत आहे.रिक्षा संघटनेने बैठक घेऊन भाडेवाढीचा निर्णय घेतला. भाडेवाढ केली तरी चालकांना केवळ तीन सीट नेण्याची बंदी घातली आहे. चौथी सीट घेतल्यास वाढीव भाडे आकारता येणार नाही. सुरक्षेच्या हेतूने हे योग्य आहे. नियम मोडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल.- निवृत्ती कुचिक, कार्याध्यक्ष, जोशी काका रिक्षा चालक मालक संघटना

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाthaneठाणे