शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भिवंडीतील माणकोली अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन

By नितीन पंडित | Updated: March 29, 2023 18:04 IST

एक तास वाहतूक विस्कळीत

नितीन पंडित

भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुर फाटा ते चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाचे व टोल कंपनीचे दुर्लक्ष झाले असल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या या जीवघेण्या रस्त्याकडे शासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष जावे यासाठी बुधवारी नागरिकांनी एकत्र येत खारबाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थ गाव विकास समितीच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.गाव विकास समितीचे प्रमुख ज्ञानेश्वर ओम मुकादम,अशोक पालकर,दिनेश म्हात्रे,रामनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली खारबाव येथे हे रास्तारोको आंदोलन करीत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.          

माणकोली अंजुरफाटा चिंचोटी या रस्त्यावर मालोडी येथे टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोलवसुली होत असते.मात्र या रस्त्याची मागील चार ते पाच वर्षांपासून दुरावस्था झाली आहे.रस्त्या तील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असे असून ही सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीवर कोणती ही कारवाई करीत नसल्याने व केली जाणारी दुरुस्ती ही तकलादू असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने करीत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असल्याची प्रतिक्रिया आंदोलनाचे संयोजक ज्ञानेश्वर ओम मुकादम यांनी दिली आहे.        

सकाळी सुरु केलेले हे आंदोलन सुमारे एक तास सुरू राहिल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.या आंदोलनात प्रशांत म्हात्रे,नितीन पाटील,मनोज म्हात्रे,देवानंद म्हात्रे,प्रवेश देवळीकर,हेमलता पालकर,कल्पना पाटील,वैशाली पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शाखा अभियंता परदेशी यांनी निवेदन स्वीकारून येत्या १५ मे पर्यंत रस्ते दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले .दरम्यान रास्तारोको आंदोलन काळात खारबाव कामण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती .तालुका पोलिसांनी त्यानंतर आंदोलकांना त्या ठिकाणाहून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.

टॅग्स :thaneठाणेagitationआंदोलन