शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अत्रे कट्ट्यावर गंध कवितेचेमधून उलगडले आयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:45 IST

अत्रे कट्ट्यावर स्वरचित कविता सादर करुन विविध विषयांना हात घालण्यात आला. 

ठळक मुद्देआयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे अत्रे कट्टयावर उलगडले कवितांद्वारेसमाजप्रबोधन करणारे विडंबन काव्य सादरराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता

ठाणे : आपल्या आयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे अत्रे कट्टयावर कवितांद्वारे उलगडण्यात आले. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ आयोजित स्वरचित कवितांचा ‘गंध कवितेचे’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम पार पडला.     जीवनात प्रत्येक गोष्टीला एक स्वत:चा रंग आहे. सुखाला जसा रंग आहे तसा दु:खालाही आहे. आशा-निराशा यांनाही रंग आहे. प्रेमाच्या विविधरंगी छटा आपल्याला दिसत असतात. तरी पण आपल्याला, माणसाच्या मनातील हळवा कप्पा अधिक भुलवतो. इतकंच नाही तर निसगार्ची विविध रुपे मानवी व्यक्तीमत्त्वाशी पुर्णतया भिनलेली असतात असे सांगत संगीता कुलकर्णी, प्रसाद भावे आणि स्नेहा शेडगे यांनी ही विविध रुपे आपल्या कवितांद्वारे उलगडली. भावे यांच्या ‘ना भेटी ना गाठी ना फुले ना गजरे’ या कवितेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी ‘आला पहिला पाऊस माझी आठवण काढ’, ‘आज माझे शत्रुही सलगी कराया लागले, काय असते ही अमिरी आता कळाया लागले’, ‘मी तुझा अन तु दुज्याची का असे सांगना’, ‘रंगुनी रंगात तुझीया जाहलो आता पुरा’, ‘आला पहिला पाऊस माझी आठवण काढ’ या कविता सादर केल्या. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निमिर्ती करण्यात आली आहे. त्यांनी ‘मैत्री तुझी नि माझी’, ‘वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी अचानक समोर येते’, ‘जगणं काय जगण्याचं स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही तुझ्याशिवाय’, ‘मिहीत रात्र रंगली कमलपुष्पे फुलली, अबोल प्रित बोलली’, ‘रंग आहे पावसाचा अंग हे भिजणारच आहे’, ‘आयुष्य संदुर असतं, आठवणींना घेऊन बसावं कधी समुद्रकिनाऱ्यावर’ तर शेडगे यांनी ‘तेव्हाही मी आणि माझा देह असतो अलिप्त’, ‘अशीच हवी असते की स्वप्नातील ती?’, ‘मनमनाशी घालत असे सांगड अन सांजवेळी होत असे मनी हुरहुर’, ‘ओसाड रानांत नदीच्या गावात विहीरीने घेतलाय पाण्याचा धसका’ या कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. शेवटी आजच्या कलयुगात प्रदुषण आणि प्लास्टीक हे दोन राक्षस असल्याचे सांगत भावे यांनी समाजप्रबोधन करणारे ‘ये प्लास्टीक की चीजे, वो बोतल ही ठहरी पोल्युटेड हवा’ हे विडंबन काव्य सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.  

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई