शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
3
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
4
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
5
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
6
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
7
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
8
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
9
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
10
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
11
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
12
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
13
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
14
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
15
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
16
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
17
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
18
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
19
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
20
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला

आयुक्त महोदय मुंब्य्राचं वाटोळं करायला घेतलं का? आव्हाडांचं पोलीस आणि महापालिका आयुक्तांना खरमरीत पत्र

By अजित मांडके | Updated: June 13, 2023 17:12 IST

"पोलीस आयुक्त असो, नाही तर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तसेच, मुंब्य्रात महापालिकेच्या काही राक्षसी महत्वांकांक्षेपोटी एकेका गल्लीत २०-२० अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला आहे."

ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खरमरीत पत्र धाडले आहेत. या पत्रात एक आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने आपणांस हे कळविताना अत्यंत दु:ख होत आहे कि, मुंब्रा परिसराचे आपण वाटोळे करायला घेतले आहे असे दिसते. पोलीस आयुक्त असो, नाही तर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तसेच, मुंब्य्रात महापालिकेच्या काही राक्षसी महत्वांकांक्षेपोटी एकेका गल्लीत २०-२० अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

गेली १४ वर्षे आम्ही दाबून ठेवले होते. पोलीस अधिकारी देखिल आम्हांला सहकार्य करायचे. ड्रग्जचा व्यवहार जवळ-जवळ बंद करण्यात आला होता. आता ड्रग्जमधून देखिल हफ्ते घ्यायला सुरुवात झाली आहे. अनधिकृत बांधकाम लक्की कंपाऊंड दुर्घटनेनंतर जवळ-जवळ बंद झाले होते. परंतु आपल्या काही अधिका-यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी आता एकेका गल्लीत २०-२० बांधकामे सुरु आहेत. मुंब्रा जेव्हा मी हातात घेतले तेव्हा पाण्याचा त्रास होता, विजेचा त्रास होता, रस्त्यांचा त्रास होता. या तिन्ही गोष्टींवर मात करुन मुंब्रा शहर हे नावारुपाला आणले. सध्या इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत तसेच त्या आपल्या निदर्शनास देखील आणून दिल्या जात आहेत. परंतु आपण त्यावर कुठलीही कारवाई करतांना दिसत नाहीत. हे खरं आहे कि, मी विरोधी पक्षातील आमदार आहे. हे देखिल खरे आहे कि, मी सरकारवर टिका करतो. म्हणून या शहराचे आपण वाटोळे करणार का? असा थेट सवालच त्यांनी या पत्राच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

शहराची आजची परिस्थिती बघता गल्ली बोळांमध्ये ड्रग्ज विकले जात आहेत. गल्ली बोळांमध्ये अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. साईटवर रिव्हॉल्वहर काढली जात आहे. मारामारीच्या घटना घडत आहेत. आता याचा पोलिसांना आणि पालिकेतील अधिकाऱ्यांना राग येणार.  पण, शेवटी हे शहर जसे होत, तसे आता राहिलेले नाही. हे शहर बदलले आहे. इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात असतील तर पाणी टंचाई उद्भवणार. ती कशी हाताळायची. रस्ते खोदले जातात ते कसे सांभाळायचे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतो, रस्त्यावर घाण पसरलेली असते, कचरा पसरलेला असतो त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पण तुम्ही दोघे जबाबदार आहात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. कि, एक शहर आपण राजकारणापोटी बर्बाद करीत आहोत. या शहराचे भविष्य बर्बाद करीत आहोत. कोणितरी तुम्हांला विचारणारा असेलच आज नाहीतर उद्या. असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्राPoliceपोलिस