शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

धुळ्यातील तरुणी ठाण्यात सापडली, जागरूक नागरिक व पोलिसांच्या मदतीने महिला दिनीच स्वगृही परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 03:57 IST

मातृछत्र आधीचेच हरपले, वडील दारूच्या अधीन गेले. विवाह झाल्यापासून दोन्ही मोठ्या भावांनीही कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धुळ्याच्या एका तरुणीने स्वावलंबी जीवनासाठी मुंबईची वाट धरली. महिलादिनी ठाण्यात दिवसभर एकाच ठिकाणी तिने तंबू ठोकल्याचे पाहून एका जागरूक नागरिकाच्या मदतीने पोलिसांनी तिचे समुपदेशन करून महिलादिनी तिला स्वगृही पाठवले.

- पंकज रोडेकरठाणे  - मातृछत्र आधीचेच हरपले, वडील दारूच्या अधीन गेले. विवाह झाल्यापासून दोन्ही मोठ्या भावांनीही कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धुळ्याच्या एका तरुणीने स्वावलंबी जीवनासाठी मुंबईची वाट धरली. महिलादिनी ठाण्यात दिवसभर एकाच ठिकाणी तिने तंबू ठोकल्याचे पाहून एका जागरूक नागरिकाच्या मदतीने पोलिसांनी तिचे समुपदेशन करून महिलादिनी तिला स्वगृही पाठवले.नंदिता (नाव बदलले आहे) असे त्या तरुणीचे नाव असून ती वडिलांसोबत धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. बारावी सायन्सला असलेली नंदिता हिचा २३ फेब्रुवारी रोजी मराठीचा पेपर होता. त्यामुळे पेपरच्या वेळेत ती सायकल घेऊन घरातून निघाली. सायंकाळ झाली तरी, घरी परतली नाही म्हणून तिच्या वडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, ती कुठेच सापडत नसल्याने अखेर त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी देवपूर पोलीस ठाण्यात जाऊन मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पण, घरातून जाताना ती कोणालाही काही सांगून निघाली नसल्याने आणि तिला कोणीही पाहिले नसल्याने तिचा शोध घेणे पोलिसांना कठीण होऊन बसले होते. त्यातच, एकीकडे सर्वत्र ८ मार्च रोजी महिला दिन साजरा होताना ती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आवारात पोलिसांसाठी सुरू केलेल्या ऊर्जिता हॉटेलजवळ येऊन उभी होती. सकाळी आलेली नंदिता सायंकाळ झाली तरी तेथेच घुटमळत असल्याचे विशाल पाटील नामक जागरूक नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला ठाणेनगर पोलीस ठाण्यात हजर केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती गप्पच बसली होती. त्यानंतर, तिने पुण्यात राहणाºया भावाचा पत्ता आणि फोन नंबर दिला. तसेच वडील दारूच्या अधीन गेले असून मातृछत्र हरपले आहे. तसेच आपणास दोन भाऊ असून एक पुण्यात तर दुसरा सैन्य दलात असल्याचे सांगितले. त्यातच, स्वावलंबी जीवनासाठी मैत्रिणीसोबत मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. पण, ती येत नसल्याचे लक्षात येताच आपणच धुळ्यावरून ट्रेनने मुंबई गाठली. काही दिवस ब्रह्माकुमारी आश्रमात घालवले. त्यानंतर, ठाण्यातील ऊर्जिता हॉटेलजवळ येऊन थांबल्याचे तिने सांगितले.तिच्या भावाशी संपर्क साधून त्याला तिची माहिती दिली. त्यानुसार, शुक्रवारी तिला तिचे पालक आणि देवपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील व त्यांच्या पथकाच्या स्वाधीन केले. शुक्रवारी ती स्वगृही परतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सांगितले.स्वावलंबी जीवनासाठीनंदिता (नाव बदलले आहे) असे त्या तरुणीचे नाव असून ती वडिलांसोबत धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील दारूच्या अधीन गेले असून मातृछत्र हरपले आहे. तसेच दोन भाऊ असून एक पुण्यात तर दुसरा सैन्य दलात आहे.मात्र, तिला स्वावलंबी जीवन जगायच्या उद्देशाने तिने घर सोडले आणि मुंबईतून ठाण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र