शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाण्यातून हरवलेली देवकी अखेर सापडली, आॅपरेशन मुस्कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:53 IST

ठाणे : आईवडील नसल्याने लहान वयात मामीने देवकीचे (नाव बदलले आहे) जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला. पण, ते न ...

ठाणे : आईवडील नसल्याने लहान वयात मामीने देवकीचे (नाव बदलले आहे) जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला. पण, ते न करण्यासाठी तिने जीव देणार असल्याचे नमूद करून घर सोडले. परंतु, शास्त्रीनगर येथून हरवलेली सतरावर्षीय देवकी तब्बल चार वर्षांनी टिटवाळा येथे वास्तव्यास असल्याचे ‘आॅपरेशन मुस्कान’ या मोहिमेंतर्गत ठाणे शहर पोलिसांनी शोधून काढले. तिने वर्षभरापूर्वीच शाळा सोडल्याचा दाखला काढण्याने ती जिवंत असल्याचा पुरावा मिळाल्यावर पोलिसांनी तिच्या शाळकरी मित्रमंडळींच्या फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपचे जवळपास १५० ते २०० ग्रुपची तपासणी करून अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यशस्वी ठरले आहेत.शास्त्रीनगर येथे मामीसोबत राहणाऱ्या देवकीचे वडील ती लहान असताना सोडून गेले होते. तर, २००९ मध्ये तिच्या आईच्या निधनानंतर ती मामामामीकडे राहण्यास आली. याचदरम्यान, ती १७ वर्षांची असताना तिच्या मामीने तिच्या लग्नाचा जबरदस्तीने घाट घातला. मात्र, लग्न करायचे नसल्याने तिने २६ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी मामी मॉर्निंग वॉकला गेली असताना घर सोडले. जाताना तिने एक चिठ्ठी मामीसाठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये मी कोणाबरोबर पळून जात नाही. तसेच मला शोधू नका. मी काही दिवसांत जीव देणार आहे, असे नमूद केले. याप्रकरणी देवकीच्या मामीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०१४ रोजी तिला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्षाने तो ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग झाला. याचा तपास सुरू असताना एक वर्षांपूर्वी देवकीने शाळा सोडल्याचा दाखला काढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली.त्यामुळे ती जिवंत असल्याचा पहिला पुरावा मिळाला. त्यानुसार, दौंडकर यांच्या पथकाने तिच्या मित्रमंडळी, नातेवाइकांशी संपर्क साधला. याचदरम्यान, तिच्या जवळच्या मित्रमंडळींच्या फेसबुकवर तिचा शोध घेऊन जवळपास १०० ते १५० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची तपासणी केली. त्यामध्ये एका ग्रुपमध्ये तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी दिसून आली.ती ज्याच्या संपर्कात होती, त्याची विचारपूस केल्यावर त्याने तिला पैशांची मदत केल्याचे पुढे आले. त्यानुसार, तिचे बँक खाते मिळून आल्यावर तिचा दुसरा नंबर पुढे आला. मात्र, तो नंबरही तिसºयाच्या नावाचा होता. त्याचा शोध घेतल्यावर अखेर गुरुवारी ठाणे शहर पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले. यावेळी तिने दिलेल्या माहितीवरून जबरदस्तीने लग्नाचा घाट घातल्याने पळून गेल्याचे सांगितले.लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार : घर सोडल्यावर काही दिवस महिला सुधारगृहात राहिली. त्यानंतर, दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, एका कंपनीत कामाला लागली. सध्या ती टिटवाळा येथे राहत आहे. तसेच त्याच कंपनीतील एकाने तिला लग्नाची मागणी घातली असून लवकरच ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस