शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

विकासकामे होत नसल्याने भाजप गटनेत्याचा सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 01:20 IST

भाजपच्या नगरसेवकांची विकासकामे होत नसल्याने पक्षाच्या निषेधार्थ गटनेते विकास म्हात्रे यांनी गुरुवारी महापौरांच्या राउंड टेबलवर झालेल्या महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीतून सभात्याग केला.

कल्याण : भाजपच्या नगरसेवकांची विकासकामे होत नसल्याने पक्षाच्या निषेधार्थ गटनेते विकास म्हात्रे यांनी गुरुवारी महापौरांच्या राउंड टेबलवर झालेल्या महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीतून सभात्याग केला. केडीएमसीच्या महासभेपूर्वी ही बैठक होते. २० जुलैला महासभा असल्याने गुरुवारी दुपारी गटनेत्यांची बैठक झाली. यावेळी आयुक्त गोविंद बोडके , महापौर विनीता राणे व विविध पक्षांचे गटनेते होते. त्यातून म्हात्रे यांनी काढता पाय घेतला.महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. असे असतानाही भाजपच्या गटनेत्यांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे महासभेत हा विषय उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले जाऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.स्थायी समितीने परिशिष्ट १ ‘अ’ नुसार प्रत्येक सदस्याच्या प्रभागात एक कोटी रुपये खर्चाचे काम प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात या परिशिष्टातील कामे केली गेली नाहीत, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. केवळ चर्चेसाठी बैठका घेतल्या जातात. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. कामांची रखडपट्टी चार वर्षांपासून सुरू आहे. या बैठकांमध्ये केवळ थातूरमातूर चर्चा केली जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. महापालिका आयुक्त विकासकामांच्या फाइलवर चर्चा करावी, असा शेरा मारतात. त्यामुळे चार वर्षांत अनेक फाइलवर चर्चा सुरूच आहे का, असा उपरोधिक सवाल म्हात्रे यांनी केला.महासभेत म्हात्रे यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली आहे. त्यांनी त्यांचा निधी रस्तेविकास कामासाठी दिला होता. मात्र, हे काम सुरू करण्यासाठी रस्त्याआड येणारी अतिक्रमणे हटवण्यात महापालिका प्रशासनाने दिरंगाई केली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश आणला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.दुसरीकडे परिशिष्ट ‘अ’मध्ये सुचवलेली कामे आयुक्तांनी केलेली नाहीत. नगरसेवक निधीतून २० लाखांची कामे मंजूर केली जातील. मात्र, महापालिकेकडे जशी गंगाजळी उपलब्ध होईल, तशी प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात उर्वरित ३० लाखांची कामे केली जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यास मनसे आणि भाजपचा विरोध आहे. त्यामुळे म्हात्रे यांनी बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले. प्रशासनाच्या निषेधार्थ त्यांच्या कृतीचे मनसेने समर्थन केले आहे.मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, ‘विकासकामांसाठी गंजाजळी उपलब्ध नाही, हे रडगाणे किती दिवस प्रशासनाकडून गायले जाणार आहे. अर्थसंकल्पात लेखाशीर्ष ठेवले जाते. त्या विकासकामाची फाइल नामंजूर केली जाते. पैसेच उपलब्ध नसतील, तर मंजूर केलेला अर्थसंकल्प राज्य सरकारच्या दरबारी पुन्हा पाठवा. त्यावर असे लिहा की, २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली. मात्र, महापालिकेस हद्दवाढ अनुदान दिलेले नाही. ते मंजूर करूनच हा अर्थसंकल्प मंजूर करावा. त्यानंतर त्याची अंमलबजावणी महापालिकेने करावी, असे आदेशित करावे. नागरिक व लोकप्रतिनिधींची होणारी फसवणूक थांबवावी.’>प्रशासनाकडून फाइल नामंजूरम्हात्रे म्हणाले, ‘मागील चार वर्षांत नगरसेवकांनी सुचवलेली कामे झालेली नाही. स्थायी समिती व महापौरांनी मंजूर केलेली कामे अर्थसंकल्पात दाखवली गेली. प्रत्यक्षात त्या कामाची फाइल तयार केल्यावर प्रशासनाने या फाइल एकतर्फी निर्णय घेत नामंजूर केल्या आहेत. त्यामुळे चार वर्षांत विकासकामे मंजूर झालेली नाहीत. भाजप सदस्यांचा प्रशासनाविरोधात रोष आहे. प्रशासनाने विकासकामांना केराची टोपली दाखवली आहे.’