शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दुर्लक्षीत डायघर आणि आजूबाजूच्या गावांचा होणार विकास, ठाणे महापालिकेने उचलली पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:09 IST

महापालिकेत समाविष्ट होऊनही मागील कित्येक वर्षे विकासापासून वंचित असलेल्या डायघर आणि आजूबाजूच्या परिसरांचा विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसात या गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

ठळक मुद्देमुलभुत सोई सुविधा पुरविल्या जाणार शहरी भागांशी जोडण्याचा प्रयत्न

ठाणे - डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सांगर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राविण्याच्यादृष्टीने पालिकेने आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. या भागाचा पाहणी दौरा अतिरिक्त आयुक्तांनी केला आहे. त्यानंतर आता या गावांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असून या गावांना शहरी भागाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येऊन ते महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत. परंतु या गावांचा विकास करीत असतांना येथील अनाधिकृत बांधकामे ही पालिकेसाठी मोठा चितेंचा विषय असून तो सोडविण्यासाठीसुध्दा हालचाली केल्या जाणार आहेत.                        डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सांगर्ली या गावांच्या एकात्मिक विकासाच्यादृष्टीने ग्रामस्थांच्यावतीने नगरसेवक बाबाजी पाटील, संतोष किणे, संतोष पाटील, गणेश म्हात्रे, गोविंद भगत यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेवून तेथील विकास कामाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर या भागाचा पाहणी दौरा करण्याचे आदेश आयुक्तांनी दोनही अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी या दोघांनीही या भागाचा पाहणी दौरा केला आहे. एकीकडे ठाणे शहर स्मार्टसिटीच्या दिशेने वेगान प्रवास करीत असताना दुसरीकडे मात्र महापालिका हद्दीत असूनही येथील भाग आजही कसा विकासापासून वंचित राहिला आहे, याची माहिती त्यांना या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने मिळाले आहे. गटार, पायवाटा, रस्ते, शौचालये, दिवा बत्ती, आरोग्याच्या सोई सुविधा यापासून कोसो दूर ही गावे असल्याची बाबही समोर आली आहे.                 या गावांची लोकसंख्या सुमारे दिड लाखांच्या आसपास असून येथील रहिवाशांना कोणत्या मुलभुत सोई सुविधांची गरज आहे, याची माहितीसुध्दा यावेळी घेण्यात आली आहे. त्यानुसार या माहितीच्या आधारे आता या गावांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार शीळ येथे उपप्रभाग कार्यालय निर्माण करणे, खिडकाळी आणि डायघर येथे दोन उद्यानांची निर्मिती करणे, खिडकाळी-डायघर येथे स्टेडीअम बांधणे व मैदाने विकसित करणे, शीळ आणि देसाई येथे आरोग्य केंद्र बांधणे, पडले येथे ज्युनियर कॉलेज आणि शाळांची दुरूस्ती, डायघर येथील शाळेचे वाढीव मजल्याचे काम, देसाई येथे आरोग्य केंद्र, प्रसुती गृह तसेच ट्रॉमा सेंटरचे बांधकाम, डायघर येथे आगरी समाज भवन बांधणे, या परिसरातील स्मशानभूमींचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण, परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते बांधणे, पदपथ आणि विद्युत कामे, पाणी पुरवठा, मलिन:सारण आदी कामे येत्या काळात केली जाणार आहेत. यासाठी किती खर्च येऊ शकतो, त्यादृष्टीने हा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.दिवा भागाचा ज्या पध्दतीने विकास आराखडा तयार करण्यात येऊन या भागातील विकास कामांना नोव्हेंबर महिन्याच्या महासभेत मंजुरी मिळाली. त्यानुसार आता डायघर आणि आजूबाजूच्या गावांचा विकास केला जाणार असून नवे घोडबंदर म्हणून येत्या काळात या भागाचा विकास केला जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

  •  या भागात सर्वात मोठी समस्या ही अनाधिकृत बांधकामांची असून येथे सोई सुविधांची वाणवा असली तरीसुध्दा अनाधिकृत बांधकामांचे प्रमाण हे जास्तीचे आहे. त्यामुळे या बांधकामांचे करायचे काय असा पेच सध्या पालिकेला सतावू लागला आहे. परंतु या बांधकामाबाबत कोणती योजना राबविली जाऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर अ‍ॅफोर्डेबेल हाऊसिंगची स्किमची राबवता येऊ शकते का? याचीही चाचपणी केली जाणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त