शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

मुंबई, ठाण्यातील विकास प्रकल्प फ्लेमिंगो अभयारण्याच्या मुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 08:15 IST

शासनाचे नियम कागदावरच : सी-लिंक, बुलेट ट्रेन, खाडीपुलांचे बांधकाम

नारायण जाधव

ठाणे : नोव्हेंबरपासून ठाणे खाडी परिसरात रुबाबदार आणि दिमाखदार दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या रोहित पक्ष्यांचे अर्थात फ्लेमिंगोंचे मोठ्या संख्येने आगमन होते. तसे ते सप्टेंबरपासूनच यायला लागतात; परंतु नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या असंख्य थव्यांमुळे खाडीपात्रात ठिकठिकाणी गुलाबी छटा डोळे दिपवून टाकतात. मात्र, अलीकडे या गुलाबी छटांवर विविध विकास प्रकल्पांनी गदा आणली आहे.सप्टेंबरपासून ते फेबु्रवारी, मार्चपर्यंत या परिसरात ४० हजार ते सव्वालाखाहून अधिक रोहित पक्षी येतात. मात्र, अलीकडे या भागात होत असलेल्या मुंबई-शिवडी सी लिंकच्या बांधकामासह ठाणे खाडीवरील प्रस्तावित वाशी येथील तिसरा पूल, बुलेट ट्रेनसाठी जाणाºया ३.२७ हेक्टर क्षेत्रासह औद्योगिक परिसरातून सोडण्यात येणाºया सांडपाण्यामुळे रोहित पक्षी सुरक्षिततेसाठी दुसरी जागा शोधू लागले आहेत. हे विकास प्रकल्प असेच वाढले, तर या फ्लेमिंगो अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात असल्याची प्रतिक्रिया पक्षीतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.वन्य आणि पक्षीप्रेमींच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने ६ आॅगस्ट २०१५ रोजी ठाणे खाडीचा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला. ठाणे खाडी परिसरात गरुडांसह इतर पक्षी व कीटकांच्या विविध २०० प्रजातींची नोंद झाली आहे. यात १३ जातींच्या प्रकारांचे खेकडेही या ठिकाणी आढळतात. यामुळे ठाणे खाडीला जगातील एक महत्त्वाचे पक्षीक्षेत्र म्हणून ओळखले जाते.सफारीसाठी बोटसेवा

फ्लेमिंगो अभयारण्यास जास्तीत जास्त पक्षीप्रेमींसह पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून राज्याच्या वन विभागाने नवी मुंबईतील ऐरोली येथे सागरी वन्यजीव विविधता केंद्राची स्थापना केली आहे. याठिकाणी फ्लेमिंगोंसह सागरी वन्यजीवांची माहिती देणारे केंद्र, माशांच्या विविध प्रजाती, शार्कचे सांगाडे ठेवण्यात आले आहेत. शिवाय बोटसेवाही सुरू केली आहे.राज्य सरकारने ठाणे खाडी फ्लेमिंगोअभयारण्याच्या १० कि.मी. परिघातील क्षेत्रात वनेतर बांधकामांवर निर्बंध घातले आहेत. अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत तेथील बांधकामांसाठी राज्य आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळांच्या स्थायी समितीची परवानगी आवश्यक आहे. मात्र, त्याचे कुठेच पालन होत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सी-लिंकसाठी हजारो झाडांची कत्तल तर केली जात आहेच. शिवाय डोंगरही भुईसपाट केला जात आहे.ठाणे खाडीचा परिसर हा फ्लेमिंगोसाठी अतिशय पोषक आहे. हवामान आणि त्यांना लागणारे खाद्य मुबलक आहे. त्यांची संख्याही वाढते आहे. मात्र, खाडीतील विविध विकास प्रकल्पांमुळे ते आपली नेहमीची जागा बदलून स्थलांतरित होत आहेत.- सुधीर गायकवाड, पक्षी अभ्यासक, ठाणे 

टॅग्स :thaneठाणेenvironmentपर्यावरण