शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

विकासकांना ईडीच्या बनावट नोटीसची दाखवली भीती; ६ कोटी ५५ लाखांची केली मागणी

By धीरज परब | Updated: March 11, 2023 22:46 IST

सदर प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

मीरारोड- मीरा भाईंदर मधील एका बड्या विकासकास ईडीची बनावट नोटीस दाखवून ६ कोटी ५५ लाखांच्या खंडणी साठी धमकावत विविध मार्गाने त्रास देणाऱ्या तिघांवर काशीमीरा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा शुक्रवार १० मार्च रोजी दाखल केला आहे. 

विकासक आनंद अग्रवाल, हरीश उर्फ मोंटू अग्रवाल व जॉर्डन परेरा या तिघांची भागीदारीतील ए कॉर्प नावाची बांधकाम व्यवसायाची कंपनी आहे. सदर तिघा विकासकांना काशीमीरा भागातील जमीन प्रकरणी ईडी ने नोटीस पाठवली असून ईडीने त्यांची चौकशी सुरु केल्याचे भाईंदर मधील इस्टेट एजंट गौतम अग्रवाल रा . सोरेटो , कंट्री क्लब समोर , अंधेरी याच्या कडून सांगितले जात होते . तर मितेश शाह  रा . एसेन रियालिटी , डीमार्ट जवळ , भाईंदर याने सदर विकासकांना त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या नावे ईडीच्या दिल्ली कार्यालयाची व सत्येंद्र माथुरिया ह्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेली चौकशीची नोटीस दाखवली होती . मितेश याने विकासकांना सांगितले कि , गौतम अग्रवालचे ६ कोटी ५० लाख व मला ५ लाख द्या तर माथुरिया साहेबांना सांगून तुम्हाला ईडीची क्लीन चिट मिळवून देतो. 

दुसरीकडे विकासक राजू शाह रा . हमिरमल टॉवर , भाईंदर पश्चिम  हे देखील ती कथित ईडीची नोटीस पालिका आयुक्तां पासून संबंधित पालिका अधिकाऱ्यांना पाठवून आनंद अग्रवालच्या बांधकाम प्रकल्पा विरुद्ध तक्रारी करत होते . आनंद अग्रवाल व त्यांच्या भागीदारांना मात्र ईडी कडून तशी कोणतीच नोटीस मिळालेली नसल्याने त्यांना संशय आला . त्या ईडी नोटीसचा अर्धवट फोटो मितेश याने  एकाच्या मोबाईल द्वारे अग्रवाल यांना पाठवला . त्यांनी सदर प्रकरणी ईडी कार्यालया कडे ऑक्टोबर २०२२ मध्ये त्या कथित नोटीस बाबत विचारणा केली.  ईडी कार्यालयाने अग्रवाल यांना ईमेल द्वारे अशी कोणतीच नोटीस बजावलेली नसून ती फेक असल्याचे कळवले. 

गौतम व राजू यांनी ईडीची ती बनावट नोटीस मार्फत विविध मार्गाने बदनामी चालवली होती. त्यामुळे आनंद यांनी जानेवारी महिन्यात पुन्हा ईडी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्या कार्यालयाने पुन्हा अशी कोणतीच नोटीस बजावली नसून तुम्ही पोलीस ठाण्यात बोगस  नोटीस प्रकरणी फिर्याद देऊ शकता असे कळवले. त्यामेलच्या आधारे आनंद अग्रवाल यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. भाईंदर पोलिसांनी चौकशी केली असता ईडीची तशी कोणतीच नोटीस नसल्याचे आढळून आले. आनंद अग्रवाल यांचा तक्रार अर्ज काशीमीरा पोलिसां कडे वर्ग केल्या नंतर पोलिसांनी गौतम अग्रवाल, मितेश शाह व राजू शाह विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम हे तपास करत आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिसfraudधोकेबाजी