शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

तिकीट निम्मं असुनही भार्इंदर - ठाणे शिवशाहीला प्रतिसाद कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 14:08 IST

एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत.

मीरारोड - एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत. मधले प्रवाशी न घेणे, मधले थांबे नसणे, वाहक नसणे या मुळे तिकीट दर कमी असुन देखील प्रवाशी मिळत नसल्याची कारणं समोर आली आहेत.एसटी महामंडळाने ठाणे - भार्इंदर - ठाणे अशी शिवशाही वातानुकुलीत बस ११ फेब्रुवारी पासुन सुरु केलेली आहे. भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर एसटी बस स्थानक असुन येथुन ठाणे एसटी स्थानकसाठी बस सुटतात. या बसचे भार्इंदर - ठाणे भाडे अवघे ४८ रुपये इतके आहे. परंतु सदर बस मध्ये वाहक नसुन भार्इंदर वरुन ठाणे असे तिकीट बस मध्ये बसण्या आधीच घ्यावे लागते. सदर बस ही कापुरबावडी, माजीवडा , कोर्टनाका या तीनच ठिकाणी उतरणारया प्रवाशांसाठी थांबते. वाहकच नसल्याने मधुन प्रवाशी घेतले जात नाहीत.एसटीच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवशाहीच्या ८ बस या मार्गावर देण्यात आल्या असुन एका बसच्या तीन फेरया या प्रमाणे रोज २४ फेरया व्हायला हव्या. पण प्रत्यक्षात मात्र रोजच्या जेमतेम १२ ते १५ फेरयाच होत आहे. त्यातच शिवशाही ही भार्इंदर वरुन सुटली की थेट कापुरबावडी, माजीवडा, कोर्ट नाका व ठाणे स्थानक येथेच थांबते. त्यामुळे भार्इंदर पश्चिम पासुन काशिमीरा नाका पर्यंत चढणारे मोठ्या संख्येने असलेले प्रवाशीच बसला मिळत नाहीत. तशीच गत पुढे देखील होते. बसला मध्ये थांबे नसल्याने वाहक दिलेली नाही.परिणामी सकाळी गर्दीच्या वेळात दोन - चार बसच पुर्ण भरुन सुटतात. तेही बस भरण्यासाठी एसटी कर्मचारी प्रवाशांना आग्रह करताना दिसतात. नंतरच्या बस मध्ये जेमतेम २० - २५ प्रवाशीच मिळतात. बस भरे पर्यंत बराच वेळ जात असल्याने बहुतांश प्रवाशी आपला लालडबाच बरा म्हणतात.वास्तविक साध्या एसटी बस वाटेतली स्थानकं घेत ठाण्याला जात असल्याने या बसना नेहमी गर्दी असते. एसटीचा हा फायद्यात चालणारा बस मार्ग मानला जातो.भार्इंदर स्थानक बाहेरुन एमबीएमटीच्या देखील ठाणे कोपरीर् साठी बस सुटतात. यात साध्या तसेच वॉल्वो बसचा समावेश आहे. भार्इंदर ठाणे मार्गेवर पालिकेच्या फक्त दोन वॉल्वो बस धावत असुन त्यांच्या साधारण ८ फेरया होतात. पालिकेच्या सदर वॉल्वोचे तिकीट हे १०० रुपये इतकं आहे. पण ही बस देखील प्रमुख थांबे घेत जाते. एसटीच्या शिवशाहीचे दर पालिका बस पेक्षा निम्मे असले तरी अजुन तरी प्रवाशी वा उत्पन्नावर परिणाम झाला नसल्याचे एमबीएमटीच्या सुत्रांनी सांगीतले.