शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तिकीट निम्मं असुनही भार्इंदर - ठाणे शिवशाहीला प्रतिसाद कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 14:08 IST

एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत.

मीरारोड - एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत. मधले प्रवाशी न घेणे, मधले थांबे नसणे, वाहक नसणे या मुळे तिकीट दर कमी असुन देखील प्रवाशी मिळत नसल्याची कारणं समोर आली आहेत.एसटी महामंडळाने ठाणे - भार्इंदर - ठाणे अशी शिवशाही वातानुकुलीत बस ११ फेब्रुवारी पासुन सुरु केलेली आहे. भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर एसटी बस स्थानक असुन येथुन ठाणे एसटी स्थानकसाठी बस सुटतात. या बसचे भार्इंदर - ठाणे भाडे अवघे ४८ रुपये इतके आहे. परंतु सदर बस मध्ये वाहक नसुन भार्इंदर वरुन ठाणे असे तिकीट बस मध्ये बसण्या आधीच घ्यावे लागते. सदर बस ही कापुरबावडी, माजीवडा , कोर्टनाका या तीनच ठिकाणी उतरणारया प्रवाशांसाठी थांबते. वाहकच नसल्याने मधुन प्रवाशी घेतले जात नाहीत.एसटीच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवशाहीच्या ८ बस या मार्गावर देण्यात आल्या असुन एका बसच्या तीन फेरया या प्रमाणे रोज २४ फेरया व्हायला हव्या. पण प्रत्यक्षात मात्र रोजच्या जेमतेम १२ ते १५ फेरयाच होत आहे. त्यातच शिवशाही ही भार्इंदर वरुन सुटली की थेट कापुरबावडी, माजीवडा, कोर्ट नाका व ठाणे स्थानक येथेच थांबते. त्यामुळे भार्इंदर पश्चिम पासुन काशिमीरा नाका पर्यंत चढणारे मोठ्या संख्येने असलेले प्रवाशीच बसला मिळत नाहीत. तशीच गत पुढे देखील होते. बसला मध्ये थांबे नसल्याने वाहक दिलेली नाही.परिणामी सकाळी गर्दीच्या वेळात दोन - चार बसच पुर्ण भरुन सुटतात. तेही बस भरण्यासाठी एसटी कर्मचारी प्रवाशांना आग्रह करताना दिसतात. नंतरच्या बस मध्ये जेमतेम २० - २५ प्रवाशीच मिळतात. बस भरे पर्यंत बराच वेळ जात असल्याने बहुतांश प्रवाशी आपला लालडबाच बरा म्हणतात.वास्तविक साध्या एसटी बस वाटेतली स्थानकं घेत ठाण्याला जात असल्याने या बसना नेहमी गर्दी असते. एसटीचा हा फायद्यात चालणारा बस मार्ग मानला जातो.भार्इंदर स्थानक बाहेरुन एमबीएमटीच्या देखील ठाणे कोपरीर् साठी बस सुटतात. यात साध्या तसेच वॉल्वो बसचा समावेश आहे. भार्इंदर ठाणे मार्गेवर पालिकेच्या फक्त दोन वॉल्वो बस धावत असुन त्यांच्या साधारण ८ फेरया होतात. पालिकेच्या सदर वॉल्वोचे तिकीट हे १०० रुपये इतकं आहे. पण ही बस देखील प्रमुख थांबे घेत जाते. एसटीच्या शिवशाहीचे दर पालिका बस पेक्षा निम्मे असले तरी अजुन तरी प्रवाशी वा उत्पन्नावर परिणाम झाला नसल्याचे एमबीएमटीच्या सुत्रांनी सांगीतले.