शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पुरस्कारानंतरही ‘स्वच्छ भारत’चा भिवंडीत बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:17 IST

भिवंडी महापालिकेने यावर्षीदेखील केंद्र सरकारच्या योजनेकरिता स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.

देशातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहीम राबवली. या अभियानाला ठिकठिकाणांतून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी हे अभियान फक्त दिखाव्यापुरते राहिले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान बारगळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी शहरात तर स्वच्छतेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी साचणारे कचऱ्याचे ढीग व शहर विकासाच्या नावाने शहरात सुरु असलेली भुयारी गटारे व काँक्रिट रस्त्यांच्या कामांमुळे शहरात धुळीने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांच्या नियोजनशून्य निर्माणामुळे शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

एकूणच या समस्यांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिकेला केंद्र शासनाचा ‘स्वच्छतेकडे वाटचाल करणारे शहर’ म्हणून २०१८ साली विशेष पुरस्कार मिळला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर महापालिकेला घनकचरा निर्मूलनासाठी तसेच वाहनखरेदीसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला होता. मात्र हा निधी नेमका कुठे वापरण्यात आला, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत. कारण पुरस्कार मिळाल्यापासून ते आजपर्यंत भिवंडीतील कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी भिवंडी मनपा प्रशासनास आजही यश आलेले नाही.

भिवंडी महापालिकेने यावर्षीदेखील केंद्र सरकारच्या योजनेकरिता स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरु वात केली आहे. मात्र, सध्या शहराकडे पाहिलं तर स्वच्छ भारत अभियान नेमके कुठे आणि कशा पद्धतीने सुरु आहे, असा प्रश्न पडतो. २०१८ साली शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या भिंतींवर मनपामार्फत स्वच्छतेचे संदेश देणारी सुंदर चित्रे रेखाटण्यात आली होती. काही ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन भिंतींवर विद्यार्थ्यांनीही सुंदर चित्रं रेखाटली होती. मात्र स्वच्छता अभियान संपले, महापालिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर या सुंदर चित्रांच्या भिंतींकडे महापालिका प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या भितींवर धूळमाती साचून या भिंती पुन्हा अस्वच्छ झाल्या आहेत. सध्या स्वच्छता अभियान सुरु झाल्याने या भिंतींवर काढलेल्या जुन्याच चित्रांना नव्याने रंगविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शौचालयांची दुरु स्ती, कचराकुंडीमुक्त शहर, हगणदारीमुक्त शहर, डम्पिंग ग्राउंडवर औषधफवारणी अशा विविध मोहिमा महापालिका प्रशासनाने सध्या हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर रात्री जादा सफाई कामगारांची नेमणूक करून रात्री शहर स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही मोहीम फक्त दिखाव्यासाठीच आहे, याचा अंदाज भिवंडीकरांना आता आला आहे. ही मोहीम फक्त स्वच्छता अभियानापुरतीच असते, याची प्रचीती देशात इतर कुठे आली असेल किंवा नसेलही मात्र भिवंडीकरांना आली आहे. केवळ पुरस्कारासाठी हा अट्टहास आहे, अशी समज भिवंडीतील नागरिकांची झाली आहे. भिवंडीत मुख्य नाक्यांवर व गर्दीच्या ठिकाणी प्रशस्त व स्वच्छ शौचालये व मुताºया नाहीत ही एक मोठी खेदाची बाब आहे. त्यामुळे भिवंडीकर नागरिक महापालिकेच्या या स्वच्छता अभियानाला यावर्षी अपेक्षित प्रतिसाद देतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने ‘स्वच्छ भिवंडी, सुंदर भिवंडी’ ही स्थानिकांची गरज आहे. मात्र भिवंडी महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा स्वच्छतेचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला आहे. त्यामुळे नागरिक मनपा प्रशासनाच्या स्वच्छतेबाबतच्या उदासीन धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी