शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारानंतरही ‘स्वच्छ भारत’चा भिवंडीत बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:17 IST

भिवंडी महापालिकेने यावर्षीदेखील केंद्र सरकारच्या योजनेकरिता स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.

देशातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहीम राबवली. या अभियानाला ठिकठिकाणांतून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी हे अभियान फक्त दिखाव्यापुरते राहिले आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान बारगळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी शहरात तर स्वच्छतेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी साचणारे कचऱ्याचे ढीग व शहर विकासाच्या नावाने शहरात सुरु असलेली भुयारी गटारे व काँक्रिट रस्त्यांच्या कामांमुळे शहरात धुळीने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांच्या नियोजनशून्य निर्माणामुळे शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

एकूणच या समस्यांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिकेला केंद्र शासनाचा ‘स्वच्छतेकडे वाटचाल करणारे शहर’ म्हणून २०१८ साली विशेष पुरस्कार मिळला होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर महापालिकेला घनकचरा निर्मूलनासाठी तसेच वाहनखरेदीसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला होता. मात्र हा निधी नेमका कुठे वापरण्यात आला, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत. कारण पुरस्कार मिळाल्यापासून ते आजपर्यंत भिवंडीतील कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी भिवंडी मनपा प्रशासनास आजही यश आलेले नाही.

भिवंडी महापालिकेने यावर्षीदेखील केंद्र सरकारच्या योजनेकरिता स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरु वात केली आहे. मात्र, सध्या शहराकडे पाहिलं तर स्वच्छ भारत अभियान नेमके कुठे आणि कशा पद्धतीने सुरु आहे, असा प्रश्न पडतो. २०१८ साली शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या भिंतींवर मनपामार्फत स्वच्छतेचे संदेश देणारी सुंदर चित्रे रेखाटण्यात आली होती. काही ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन भिंतींवर विद्यार्थ्यांनीही सुंदर चित्रं रेखाटली होती. मात्र स्वच्छता अभियान संपले, महापालिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर या सुंदर चित्रांच्या भिंतींकडे महापालिका प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या भितींवर धूळमाती साचून या भिंती पुन्हा अस्वच्छ झाल्या आहेत. सध्या स्वच्छता अभियान सुरु झाल्याने या भिंतींवर काढलेल्या जुन्याच चित्रांना नव्याने रंगविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शौचालयांची दुरु स्ती, कचराकुंडीमुक्त शहर, हगणदारीमुक्त शहर, डम्पिंग ग्राउंडवर औषधफवारणी अशा विविध मोहिमा महापालिका प्रशासनाने सध्या हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर रात्री जादा सफाई कामगारांची नेमणूक करून रात्री शहर स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही मोहीम फक्त दिखाव्यासाठीच आहे, याचा अंदाज भिवंडीकरांना आता आला आहे. ही मोहीम फक्त स्वच्छता अभियानापुरतीच असते, याची प्रचीती देशात इतर कुठे आली असेल किंवा नसेलही मात्र भिवंडीकरांना आली आहे. केवळ पुरस्कारासाठी हा अट्टहास आहे, अशी समज भिवंडीतील नागरिकांची झाली आहे. भिवंडीत मुख्य नाक्यांवर व गर्दीच्या ठिकाणी प्रशस्त व स्वच्छ शौचालये व मुताºया नाहीत ही एक मोठी खेदाची बाब आहे. त्यामुळे भिवंडीकर नागरिक महापालिकेच्या या स्वच्छता अभियानाला यावर्षी अपेक्षित प्रतिसाद देतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने ‘स्वच्छ भिवंडी, सुंदर भिवंडी’ ही स्थानिकांची गरज आहे. मात्र भिवंडी महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा स्वच्छतेचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला आहे. त्यामुळे नागरिक मनपा प्रशासनाच्या स्वच्छतेबाबतच्या उदासीन धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी